Chhoti Badi Baatein

  • हिंदी निबंध संग्रह - Hindi Essay Collection

Diwali Nibandh in Marathi – दिवाळी निबंध मराठी

(दिवाळी निबंध मराठी – Diwali Essay in Marathi – Diwali Festival Essay in Marathi – Diwali Nibandh in Marathi – Short Diwali Essay in Marathi – Diwali Information in Marathi Essay) 

मित्रांनो दिवाळी हा भारतीयांचा मुख्य सण आहे आणि तो भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे, ज्याच्या आगमनामुळे आपल्या समाजातील विविध स्तरातील लोक एकत्र येत असल्याने सणाचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व वाढते.

आजच्या लेखाद्वारे आम्ही तुमच्यासोबत विविध शब्द मर्यादांमध्ये “ दिवाळी निबंध मराठी (Diwali Essay in Marathi) ” शेअर करत आहोत.

Table of Contents

Diwali Festival Essay in Marathi – (10 lines) दिवाळी वर मराठी निबंध

10 Lines on Diwali Festival Essay in Marathi

  • दिवाळी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, ज्याला “दीपावली” असेही म्हणतात.
  • दिवाळी हा हिंदू संस्कृतीला आधार देणारा महत्त्वाचा सण आहे.
  • दिवाळी हा आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुध्द द्वितीयेपर्यंत पाच दिवसांचा सण असतो.
  • दिवाळीच्या सणातल्या पाच दिवसांत प्रत्येक घरी कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास केली जाते.
  • दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची परंपरा असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.
  • दिवाळीच्या दिवशी घरासमोर सुंदर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात.
  • फटाक्यांबरोबरच मुलांना दिवाळीत नवीन आणि छान कपडे आणि विविध खेळणीही मिळतात.
  • दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला जातो आणि इतरांनाही शेअर केला जातो.
  • दिवाळीच्या काळात घर, कार्यालय, कारखाने सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
  • दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो त्यामुळे सर्वत्र एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

Short Essay On Diwali In Marathi – (200 शब्द ) दिवाळी निबंध मराठी

दिवाळी हा हिंदूंचा अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण आहे. दिवाळी हा आपल्या भारतात साजरा होणारा सर्वात मोठा सण आहे. तसे, आपल्या भारतात अनेक सण साजरे केले जातात. पण दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. 

त्रेतायुगात 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान श्री राम अयोध्येत परतल्याचा आनंदोत्सव साजरा करताना अयोध्येत सर्वत्र दिवे लावण्यात आले होते, त्यामुळे संपूर्ण अयोध्या स्वर्गासारखी उजळून निघाली होती. भगवान रामाच्या अयोध्येत आगमन झाल्याबद्दल दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळी सण हा 5 दिवसांचा सण आहे. वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत हा सण साजरा केला जातो. या उत्सवातील महत्त्वाच्या दिवसांमध्ये वसु-बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज यांचा समावेश होतो. दिवाळी हा सण प्रामुख्याने उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

दसऱ्यानंतर 20 दिवसांनी दिवाळी येते. दसऱ्यानंतर प्रत्येक घरात दिवाळीची तयारी सुरू होते. घराची डाग-डुजी करणे, साफसफाई करणे, रंगकाम करणे, नवीन कपडे खरेदी करणे, विविध प्रकारची मिठाई घरा-घरामध्ये बनवली जाते. 

सर्वत्र दिवे आणि आकाश कंदील लावले जातात, प्रवेशद्वारावर, अंगणात रांगोळ्या काढल्या जातात, फटाके फोडले जातात आणि स्वादिष्ट फराळाचा आस्वादही घेतला जातो.

दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधलेले जातात. नवीन कपडे घालून फटाके फोडण्याचा आनंद घेतल्या जातो. दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांकडे जातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात, मिठाई देतात. अशा प्रकारे दिवाळी हा एक आनंदाचा सण आहे जो आपल्या जीवनात आनंद, प्रेम आणि बंधुभाव पसरवतो.

Essay On Diwali In Marathi – (500 शब्द ) दिवाळी वर मराठी निबंध

दिवाळीचे दुसरे नाव ‘दीपावली’ आहे. या सणाचा अर्थ ‘दीपोत्सव’ किंवा ‘प्रकाशोत्सव’ असा आहे. दीपोत्सवात घरांच्या अंगणात अगणित दिवे लावले जातात. दिव्यांच्या या असंख्य रांगा आकाशातील ताऱ्यांसारख्या दिसतात.

दिवाळी सणासुदीचे दिवे सुंदर, रंगीबेरंगी आणि निसर्गाचे प्रतिनिधित्व करतात. दिव्यांच्या या तारांमुळे रात्रीच्या अंधारात घरे अधिक सुंदर दिसतात. लोकांच्या घरांचे अंगण जणू दिव्यांच्या ओळीने सजले जातात. या ओळी एक चैतन्यशील वातावरण तयार करतात जे प्रत्येकाला हवेहवेसे वाटते.

या उत्सवाची सुरवात ‘वसुबारस’ पासून होते आणि ‘भाऊबीज’ साजरा केल्यानंतर, दिवाळीची सांगता होते. दिवाळी हा सर्व वयोमान्य, मुले, स्त्री-पुरुषांच्या हृदयातील प्रेमाचा सण आहे. दिवाळी मुळे प्रत्येक घराला एक अनोखे रूप आणि अनुभव येते. हा सण नवीन कपडे, दागिने आणि सामान्य घरगुती वस्तू खरेदी करण्याची संधी आहे. याबरोबरच फटाक्यांची आतिशबाजी आणि विविध दिवाळी फराळाच्या स्वादाची अनोखी भरपूर अनुभवायला मिळते.

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपली प्राचीन संस्कृती आपल्याला सर्व प्राण्यांशी प्रेमाने वागण्याची शिकवण देते. या शिकवणीनुसार वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यांना गोड खाद्य पदार्थ दिले जाते. गायीपासून आपल्याला दूध व इतर फायदे मिळतात आणि शेतीसाठी बैलांची मदत महत्त्वाची आहे. या गोष्टी लक्षात ठेवून गोधनाची कृतज्ञतापूर्वक पूजा केली जाते.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यांचा विशेष मान असतो. ह्या दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा दिवाळीचा मुख्य पहिला दिवस आहे. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे, नवीन वस्त्रे परिधान करायची, देवदर्शन करायचे, आणि सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी फराळ करून ह्या दिवसाचा आनंद साजरा करायचा असतो.

ह्या दिवसाची एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे, या कथेअनुसर भगवान श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली होती तो हा दिवस. दुष्टांचा नाश आणि सुटकेचा आनंद ही या दिवसातील एक महत्त्वाची घटना आहे आणि याचे कारण म्हणजे या दिवसामागचा आनंद साजरा करण्यासाठी ही कथा सांगितली जाते.

अश्विन महिन्याचे शेवटचे दोन दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले दोन दिवस – या चार दिवसांच्या मुख्य दिवाळीच्या अवसरी, आपल्याला विशेषपणे आकर्षक आणि महत्त्वपूर्ण कामांसाठी सजवायला मिळतात. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी, घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, आणि ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरोघरी सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा केली जाते. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतात. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनानंतर, आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) ह्या देवीची पण पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या नंतर, फटाक्यांची आतिशबाजी केल्यानंतर, त्या दिवसाच्या आनंदाच्या घडणारांमध्ये आपल्याला सहभागी व्हायला मिळतो.

या नंतर पाडवा, असा एक दिवस आहे जो बलिप्रतिपदा आणि साडेतीन मुहुर्तांच्या एक मुहुर्तातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी, अनेक नवे प्रकल्प सुरू केले जातात. पाडव्याच्या दिवशी, पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून विविध वस्तू, दागिने, किंवा साडी उपहार देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच “यमद्वितीया” किंवा “भाऊबीज” असे म्हणतात. बहीण आणि भाऊ यांच्यातील उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहीण भावाला आंघोळ घालते, गोड अन्न अर्पण करते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू ओवाळणी घालतो.

दिवाळीच्या सणातला लहान मुला-मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला बनवणे, त्यावर चित्रे मांडणे, फटाके उडवणे आणि सुट्यांचा आनंद घेणे असा आणि स्त्रियांसाठी संध्याकाळी दारापुढे छान रांगोळ्या काढणे आणि स्वादिष्ट व्यंजन तयार करणे, ह्या सणाच्या विशेष आनंदाच्या घडणारांमध्ये एक आहे.

एकमेकांना भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड्स वगैरे देऊन आनंद साजरा केला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश आणणारी ही दिवाळी सर्वांना प्रिय आहे. जो तो त्याच्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो आणि आनंद घेतो. दिवाळी म्हणजे अमर्याद आनंद, दिवाळीच्या अनेक सुखद आठवणी मनात अनेक दिवस रेंगाळत राहतात.

———————————————-//

अन्य लेख पढ़ें:

  • 110+ दिवाली की शुभकामनाएं संदेश – Diwali Wishes In Hindi
  • दि‍वाली पर हिंदी में कविताएँ – Diwali Poems in Hindi
  • दीवाली पर संस्कृत निबंध – Essay on Diwali in Sanskrit
  • दिवाली पर निबंध – Essay on Diwali in Hindi
  • दिवाली के बारे में जानकारी और रोचक तथ्य – Information & Interesting Facts About Diwali
  • 50+ भाई दूज पर शुभकामना संदेश – Best wishes message on Bhai Dooj in Hindi
  • भाई दूज क्यों मनाया जाता है? भाई दूज की कहानी और महत्व हिंदी में

Enjoy this blog, Please share this

  • Share on Tumblr

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Nibandh shala

दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi :- दिवाळी हा संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. विशेष बाब म्हणजे हा सण जवळपास प्रत्येकाचाच आवडीचा सण आहे. सर्वांनाच दिवाळी हा सण खूप आवडतो. त्यामुळेच आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध essay on diwali in marathi लिहिलेला आहे.

दिवाळी वर मराठी निबंध सर्वच विद्यार्थांसाठी खूपच उपयुक्त आहे. माझा आवडता सण दिवाळी निबंध my favourite festival diwali essay in marathi हा तुम्हाला नक्कीच आवडेल.

दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi

दिवाळी वर 10 ओळीचा निबंध | 10 lines on my favourit festival diwali in marathi.

  • दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे.
  • हा सण इंग्रजी दिनदर्शिका नुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो. या सणाची तारीख निश्चित नसते.
  • दिवाळीला दीपावली किंवा दीपोत्सव असे देखील म्हटले जाते.
  • दिवाळीच्या दिवशी घराची आणि अंगणाची स्वच्छ्ता केली जाते, अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते.
  • दिवाळीच्या दिवशी अंगाला उठणे लाऊन अंघोळ करण्याची प्रथा आहे.
  • दिवाळीच्या दिवशी अंगणात मातीचे दिवे लावले जातात. त्यामुळे या सणाला प्रकाशाचा सण म्हणून देखील ओळखले जाते.
  • दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे भाहुबिज होय. या दिवशी बहीण भावला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रेरणा करते.
  • लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते.
  • दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दिवू लावले जातात आणि लहान मुले फटाके फोडून आनंद व्यक्त करतात.
  • दिवाळीच्या दिवशी लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे आणि गुलाब जमून हे फराळाचे पदार्थ खायला मिळतात. मला दिवाळी हा सण खूप आवडतो.

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi (700+ शब्दात)

Essay on diwali in marathi

भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. भारत देशात संपूर्ण वर्षभर विविध धार्मिक , सांस्कृतिक आणि सामाजिक सण उत्सव साजरे केले जातात. यातून सामाजिक बांधिलकी जोपासली जातेच शिवाय लोक मतभेद विसरून एकत्र जमतात.

मला तसे तर हिंदू संस्कृतीमध्ये साजरे केले जाणारे सर्वच सण उत्सव आवडतात पण दिवाळी हा माझा सर्वात जास्त आवडणारा सण आहे. म्हणजेच माझा आवडता सण दिवाळी आहे. या सणाला दिवाळी किंवा दीपावली असे देखील म्हटले जाते. अनेक कवी आणि लेखक दिवाळी या सणाचे वर्णन दीपोत्सव असे देखील करतात. कारण या सणाच्या दिवशी सायंकाळी दिवे लावण्याची प्रथा आहे.

  • माझी आजी मराठी निबंध
  • माझी शाळा मराठी निबंध
  • झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध

दिवाळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सर्वात मोठा हिंदू सण आहे. हा सण केवळ हिंदूच नव्हे तर इतर धर्मीय लोक देखील साजरा करताना दिसतात. या सणाचे विशेष म्हणजे यातून खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.

दिवाळी (essay on diwali in marathi) हा सण आश्विन या मराठी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिका नुसार दिवाळी हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये येतो. पण या सणाची तारीख निश्चित नसते. हा सण कधी ऑक्टोबर महिन्यात येतो तर कधी नोव्हेंबर महिन्यात येतो. हा सण भारताबाहेर विदेशात राहणारे हिंदू धर्मीय लोक देखील मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसून येतात.

दिवाळी सणाच्या निमित्ताने शाळेला पंधरा ते वीस दिवस सुट्या असतात. तसेच ऑफिस आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील आठ ते दहा दिवस सुट्या असतातच. त्यामुळे घरातील सर्व मंडळी एकत्र असतात. तेंवहापासून दिवाळी सणाच्या तयारीला सुरुवात होते.

गावातील आम्ही सर्व मित्र एकत्र जमतो आणि सुंदर किल्ले बनवतो. किल्ले बनवण्यात एक वेगळीच मजा असते. तसेच आम्ही संपूर्ण गावासठी एक मोठा आकाश कंदील तयार करतो. यासाठी आम्हाला गावातील इतर ज्येष्ठ मंडळींची मदत देखील लाभते. नंतर हा आकाशकंदील गावच्या मध्यभागी लावण्यात येतो.

आमच्या घरी देखील मी आणि माझी बहिण मिळून एक छोटा आकाश कंदील बनवतो. आई आणि आत्या फराळाचे पदार्थ बनवण्यात व्यस्त असतात.लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे असे अनेक पदार्थ बनवण्यात येतात. यात सर्वांचे आवडते गुलाब जमून तर मला खूपच आवडतात. दिवाळीच्या अगोदर आम्ही सर्वजण मिळून घराची आणि अंगानाची स्वच्छता करतो.

दिवाळीचा सण (diwali festival essay in marathi) हा तीन किंवा पाच दिवसांचा असतो. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं आणि दुसरं पाणी असतं. तिसऱ्या दिवशी भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन असते.दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला उठणे लावून आंघोळ केली जाते.

घरातील सर्व मंडळी नवीन कपडे परिधान करतात आणि आनंदाने फराळाचे पदार्थ खातात. या दिवशी पाहुण्यांना आणि मित्रांना घरी फराळाला बोलावण्याची प्रथा आहे. लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. घरातील प्रौढ मंडळी लहान चिमुकल्यांना पैसे आणि भेटवस्तू देतात.

ताई अंगणात सडा टाकून सुंदर रांगोळी काढते. सायंकाळी अंगणात दिवे लावले जातात. घरातील मंडळी आणि लहान मुले फटाके वाजवून आनंद व्यक्त करतात. फटाके वाजवणे लहान मुलांना खूप जास्त आवडते.

भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्य साठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीला भेटवस्तू देतो आणि रक्षण करण्याचे शपथ घेतो. त्याचप्रमाणे त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते.

  • मी शिक्षक झालो तर मराठी निबंध

दिवाळी हा सण खूपच आनंदाचा आणि जल्लोषाचा असतो. यात मनोरंजन तर होतेच आणि समाजातील लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. त्यामुळे दिवाळी हा सण मला खूप खूप आवडतो.

टीप: मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दिवाळी वर मराठी निबंध, माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi लिहून दिलेला आहे. हा सण इयत्ता १,२,३,४,५,६,७,८,९,१० पर्यंत कोणत्याही वर्गासाठी तुम्ही वापरू शकता.

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्ही दिवाळीला कश्या प्रकारे मज्जा करता, ते देखील कमेंट करून कळवा, धन्यवाद…!

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

MarathiVeda

Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

January 26, 2024

हिन्दी निबंध , मराठी निबंध

Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी : ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला तीन भाषांमध्ये निबंद वाचायला मिळेल. तरी शेवटी ही पोस्ट वाचून तुमच्या प्रतिक्रिया कोंमेंट्स मध्ये लिहा.

Table of Contents

दिवाळी निबंध मराठी | Diwali Nibandh Marathi | Diwali Essay in Marathi

Essay On Diwali : दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.

ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. (Essay On Diwali) नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा (Essay On Diwali) हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.

अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. (Essay On Diwali) व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो. (Essay On Diwali)

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

  • दिवाळीच्या शुभेच्या | Diwali Wishes In Marathi
  • दिवाळीची संपूर्ण माहिती | Diwali Information 2023 Marathi
  • धनत्रयोदशीची संपूर्ण माहिती | Dhanteras Information In Marathi
  • धनत्रयोदशीच्या शुभेच्छा | Dhantrayodashi Wishes In Marathi
  • वसुबारस निमित्त शुभेच्या | Vasubaras Wishes In Marathi
  • लक्ष्मी पूजन शुभेच्छा | Laxmi Pujan Diwali Wishes In Marathi
  • भाऊबीज शुभेच्छा | Bhaubeej Wishes In Marathi
  • नरकचतुर्दशी शुभेच्या, माहिती | Narak Chaturdashi Wishes, Info

दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.

दीपावली पर निबंध हिंदी में | Hindi Essay On Diwali

Essay On Diwali : दीपावली का त्योहार पांच दिनों तक चलने वाला सबसे बड़ा पर्व होता है। दशहरे के बाद से ही घरों में दीपावली की तैयारियां शुरू हो जाती है, जो व्यापक स्तर पर की जाती है। इस दिन भगवान श्रीराम, माता सीता और भ्राता लक्ष्मण के साथ चौदह वर्ष का वनवास पूर्ण कर अयोध्या लौटे थे। इसके अलावा दीपावली को लेकर कुछ और भी पौराणिक कथाएं प्रचलित हैं।

प्रस्तावना – प्रत्येक समाज त्योहारों के माध्यम से अपनी खुशी एक साथ प्रकट करता है। हिन्दुओं के प्रमुख त्योहार होली, रक्षाबंधन, दशहरा और दीपावली हैं। इनमें से दीपावली सबसे प्रमुख त्योहार है। इस त्योहार का ध्यान आते ही मन-मयूर नाच उठता है। यह त्योहार दीपों का पर्व होने से हम सभी का मन आलोकित करता है।

दीपावली मनाई जाती है – यह त्योहार कार्तिक माह की अमावस्या के दिन मनाया जाता है। अमावस्या की अंधेरी रात जगमग असंख्य दीपों से जगमगाने लगती है। कहते हैं भगवान राम 14 वर्ष के वनवास के बाद अयोध्या लौटे थे, इस खुशी में अयोध्यावासियों ने दीये जलाकर उनका स्वागत किया था। श्रीकृष्ण ने नरकासुर नामक राक्षस का वध भी इसी दिन किया था। यह दिन भगवान महावीर स्वामी का निर्वाण दिवस भी है। इन सभी कारणों से हम दीपावली का त्योहार मनाते हैं।

दीपोत्सव मनाने की तैयारियां – यह त्योहार लगभग सभी धर्म के लोग मनाते हैं। इस त्योहार के आने के कई दिन पहले से ही घरों की लिपाई-पुताई, सजावट प्रारंभ हो जाती है। नए कपड़े बनवाए जाते हैं, मिठाइयां बनाई जाती हैं। वर्षा के बाद की गंदगी भव्य आकर्षण, सफाई और स्वच्‍छता में बदल जाती है। लक्ष्मी जी के आगमन में चमक-दमक की जाती है।

Essay On Diwali | दिवाळी निबंध मराठी, हिन्दी, इंग्रजी

उत्सव – यह त्योहार पांच दिनों तक मनाया जाता है। धनतेरस से भाई दूज तक यह त्योहार चलता है। धनतेरस के दिन व्यापार अपने बहीखाते नए बनाते हैं। अगले दिन नरक चौदस के दिन सूर्योदय से पूर्व स्नान करना अच्‍छा माना जाता है। अमावस्या के दिन लक्ष्मीजी की पूजा की जाती है। ( Essay On Diwali )

खील-बताशे का प्रसाद चढ़ाया जाता है। नए कपड़े पहने जाते हैं। फुलझड़ी, पटाखे छोड़े जाते हैं। असंख्य दीपों की रंग-बिरंगी रोशनियां मन को मोह लेती हैं। दुकानों, बाजारों और घरों की सजावट दर्शनीय रहती है। अगला दिन परस्पर भेंट का दिन होता है। एक-दूसरे के गले लगकर दीपावली की शुभकामनाएं दी जाती हैं। गृहिणियां मेहमानों का स्वागत करती हैं। लोग छोटे-बड़े, अमीर-गरीब का भेद भूलकर आपस में मिल-जुलकर यह त्योहार मनाते हैं।

Essay On Diwali Festival | दिवाळी निबंध इंग्रजी मध्ये

Essay On Diwali : Diwali, a festival of light is the most popular festival in India which symbolizes the spiritual “victory of good over evil, light over darkness, and knowledge over ignorance”. This year Diwali is going to be celebrated from 10th November to 15th November 2023. Diwali is an important religious festival originating all across India. Most people think of Diwali as a Hindu festival, but it is also celebrated by Sikhs and Jains with the same enthusiasm and happiness. In India, people celebrate the story of King Rama’s return to Ayodhya after defeating Ravana. People celebrate Diwali by lighting rows of clay lamps, Lakshmi puja, firecrackers festivities, and distributing sweets.

Essay On Diwali :

A “festival of lights,” Diwali (also known as Divali or Deepavali) honours the blessings of victory, freedom, enlightenment, and the triumph of light over darkness and good over evil. The word “row of lights” (Sanksrit Deepavali) is where the name originates. Diwali celebrants burn a large number of candles and clay lamps, or diyas, and scatter them throughout their homes and along the streets to illuminate the gloomy night.

The main Diwali celebration takes place on the third day of a five-day festival throughout the majority of India. Only the main day is often observed in other locations where Diwali is observed.

Diwali is observed by a large number of people globally. Thus, customs vary, but there are some commonalities, such as candle lighting and family gatherings. Since the primary Diwali celebration occurs on the new Moon’s day when the sky is the darkest and a significant portion of the celebration centres on the light. In the home, streets, places of worship, and even floating down lakes and rivers, candles, clay lamps, and oil lanterns are lit. On the night of Diwali, fireworks are also lit off, with some believing this wards off evil spirits. The meal can be rather lavish, with a table covered in speciality foods and desserts.

The Hindu calendar’s first day of the new year in India is observed on Diwali. The fourteen-year exile of Lord Ram is commemorated on this holiday. He also overcame Ravana, the ten-headed king who had kidnapped his wife, Sita, at this time. In the Ramayana, an old epic about Ram, Sita, and morality, other significant characters include Hanuman (the Monkey God) and Laxman (Ram’s younger brother).

Regardless of how it is observed, Diwali or Deepavali is a national holiday that celebrates joy, happiness, and brotherhood. Families gather to celebrate one another’s health during this time.

Even though the festival’s structure and style of celebration have changed, it will be encouraging to see youth initiatives use this day to integrate all communities further and invite everyone to take part in the celebrations. When other groups observe their own festivals, the same must be reciprocated. India will then be able to really claim the spirit of inclusivity and secularism.

तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात

Janmashtami Dahi Handi Essay

Janmashtami Dahi Handi Essay | जन्माष्टमी, दही हांडी निबंध

Bail Pola Nibandh Marathi - बैल पोळा निबंध

Bail Pola Nibandh Marathi – बैल पोळा निबंध

Swatantrata Diwas (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन निबंध 2023

Swatantrata Diwas (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन निबंध 2023

Leave a comment cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

माझा आवडता सण दिवाळी निबंध Diwali Essay In Marathi

diwali essay in marathi भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणामध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा सण म्हणजे दिवाळी . तिमिरातून तेजाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीचा सण मोठा , नाही आनंदाला तोटा . दिवाळी हा सण अत्यंत आनंद देणारा सण आहे. म्हणून भारतातच नाही तर  इतर देशात सुद्धा प्रसिद्ध आहे. diwali nibandh in marathi दिवाळी पेक्षा दीपावली हा शब्द या सणासाठी जास्त शोभून दिसतो. दीपावली म्हणजे सणांच्या ओळी . हा सण इतर सना पेक्षा वेगळा आहे त्याचे हेच कारण होय. या सणात आकाशातले तारे जमिनीवर येतात अशी कविकल्पना आहे. शरद ऋतूच्या मध्यभागी येणारा हा दीपोत्सव काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो.

दिवाळी सण निबंध diwali essay in marathi

diwali nibandh marathi दिवाळी म्हणजे पणत्यांची आरास, दिव्यांचा उत्साह, रोषणाई, फराळ, धमाल, रांगोळी, कंदील, फटाके, मजा-मस्ती, सुट्ट्या आणि बरंच काही दिवाळी म्हटलं की सगळ्यांची लगबग सुरू होते. साफसफाई, कपड्यांची खरेदी, नवीन वस्तू, सोन्याची खरेदी, मिठाई फराळाची तयारी बाप रे! किती सारी तयारी. किती काम! पण काही असो प्रकाश आणि आसमंत उजळून टाकणारा सण प्रत्येकाला हवाहवासा वाटतो.

प्रत्येक वर्षाची दिवाळी नव्याने आनंद, उत्साह आणि भरभराट घेऊन येते. दिवाळीची मज्जा काही औरच असते. दिवाळी पहाट अभ्यंगस्नान आणि उटण्याचा सुगंध, रंगात रंगलेली रांगोळी, जगमगता कंदील, मातीचे दिवे आणि वेगवेगळे स्टिकर्स, करंजा, चिवडा, चकली वा काय भारी सण आहे. हा वर्षातून एकदा येतो आणि नवीन उमेद देतो .

अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दिवा मांगल्याचे प्रतीक मानला जातो. प्रकाशाने अंधारावर प्राप्त केलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी करतात. दिव्याच्या प्रकाशाने जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून दीपोत्सव साजरा केला जातो.थंडीची चाहूल लागताच अश्विन महिन्यातील शेवटच्या आठवड्यात दीपावली हा सण येतो. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या शुभ दिवसांनी दीपावलीचा उत्सव साजरा केला जातो.

दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी

घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करून सजविले जाते. या दिवशी घरातील पैशांची पूजा केली जाते. नुसते पैसेच नाही तर लक्ष्मी बरोबर  ज्ञानरूपी  सरस्वतीचे देखील पूजन केले जाते. म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी असे म्हणतात. या दिवशी लोक घरासमोर कंदील लावतात. आकाश कंदील यामुळे घराला एक वेगळीच शोभा येते . वर्षभरात केले जात नाही तेवढे तिखट-गोड पदार्थ या दिवशी केले जातात. दिवाळीच्या दिवशी घरासमोर पणत्या लावून अंधाराला दूर केले जाते.

नवा दिवस नवे वर्ष नवी आशा नवा हर्ष नवे विचार नवी कल्पना नवे पाऊल नवी चेतना मनापासून ही एक इच्छा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

असे म्हणत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देतात. ऐश्वर्याचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीला रांगोळी काढून स्वागत केले जाते.रात्रभर दिव्यांची आरास केली जाते. हा दिवस अतिशय शुभ असल्याने या दिवशी स्त्रिया सोने व चांदीचे भांडी खरेदी करतात. हा दिवस धन्वंतरी चा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. दिवाळीचा सण आपल्याला हेच सांगतो की जर कुणाबद्दल मनात अडी ताण असेल तर त्याला फटाके सारखे उडवून लावा आणि आयुष्याची नव्याने सुरू करा.

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी .

त्या दिवशी सकाळी लवकर उठून सुर्योदया अगोदर अंघोळ करून तयार होण्याची परंपरा आहे. पुरातन काळात सांगण्यात येते की असुरांचा राजा नरकासुर नेपाळच्या दक्षिण प्रांतात राज्य करत होता. एका युद्धात त्याने इंद्रावण विजय प्राप्त केला आणि देवांची माता अदिती तिचे सुंदर कर्ण कुंडल हिसकावून घेतले आणि देवांच्या 16000 कन्यांना कैदेत ठेवले. म्हणून श्रीकृष्णाने नरक चतुर्दशी या दिवशी या दानवाचा वध केला आणि त्या सोळा हजार कन्याची सुटका केली. त्या कन्यांनी तेल मर्दन  करून स्नान केले.

दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन .

या दिवशी अमावस्या असते. असे असूनही हा दिवस शुभ मानला जातो. कारण या दिवशी संत आणि महात्मे यांनी समाधी घेऊन आपल्या देहाचा त्याग केला होता. आज दिवशी प्रभू राम सीता आणि लक्ष्मण 14 वर्षे वनवास भोगून अयोध्येत परत आले होते.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा .

हा दिवस वर्षप्रतिपदा म्हणून जाणला जातो. यादिवशी इडापिडा टाळो बळीराजाचे राज्य येऊ असे म्हणून बळीराजाची पूजा करतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर जाऊन दिवा लावतो. हा दिवस नववर्षाची सुरुवात आहे असे म्हणून व्यापारी मंडळी आपल्या व्यवसायाची पूजा करतात. या दिवशी घरामध्ये पाडवा घालतात.

पत्नी आपल्या नवऱ्याला उटणे लावून अभ्यंगस्नान घालते अन नंतर पाटावरती रांगोळी काढून पत्नी आपल्या नवऱ्याला ओवाळते. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी नवरीच्या माहेरी साजरी केली जाते. याला दिवाळी सण म्हणतात. यादिवशी जावयाला आहेर केला जातो. नवरा बायकोला सुंदर अशी भेटवस्तू देतो. असेही म्हणण्यात येते की या दिवशी इंद्र देवाच्या कृपेने गोकुळात अतिवृष्टी झाली होती म्हणून श्रीकृष्णाने प्रजेच्या रक्षणासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता.

दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज

दिवाळी कविता मराठी.

आली आली दिवाळी बहीण भावाला ओवाळी साजरी करूया भाऊबीज एकत्रित येऊन आपल्या घरी

भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते. भाऊ आपल्या बहिणीला सुंदर अशी भेट वस्तू  देतो. लग्न झालेल्या मुली या दिवशी आपल्या लाडक्या भावासाठी माहेरी येतात. असे पाच दिवस आनंदात साजरे केले जातात. कामानिमित्त बाहेर गेलेले लोक घरी परत जातात आणि आनंदाने दिवाळी कुटुंबासोबत साजरी करतात. दिवाळी, फटाके,रांगोळी, पणत्या या गोष्टी येतात पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे किल्ला.

लहान मुलं एकत्र जमून किल्ला बनवता. आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले यांना फार पूर्वीपासून मोलाचे महत्त्व आहे. किल्ले बनवण्याची परंपरा आपल्या पूर्वजांनी आपला अभिमानास्पद इतिहास पुढच्या पिढीने आत्मसात करावा याकरता निर्माण केला गेला आहे. लहान मुलं एकत्र येऊन दगड,विटा,माती गोळा करतात आणि आपल्या मनातील गडाला हवा तसा आकार देतात.

त्यावर मातीचे बनवलेले पुतळे मावळे म्हणून ठेवतात. माती पासून बनवलेले प्राणी ठेवतात आणि किल्ल्याची सजावट करतात. यादरम्यान स्पर्धा आयोजित केल्या जातात. स्पर्धेतून मुलांमधील आकलन शक्ती प्रदर्शित होत असते. अनेक सार्वजनिक मंडळे संस्था इतकेच नव्हे तर राजकीय पक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून लहान मुलांच्या या गुणांना वाव देत आहे. फटाके लावणे, फराळ करणे,रांगोळी काढणे,  किल्ले बनवणे,  खरेदी करणे, एकमेकांना शुभेच्छा देणे एवढ्या सगळ्या दिवाळीचे पाच दिवस कसे निघून जातात समजतच नाही. दिवाळीच्या सणासाठी हे पाच दिवस सुद्धा कमीच आहे.

आम्ही दिलेल्या diwali essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता सण दिवाळी निबंध अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या nibandh on diwali in marathi   या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि diwali nibandh marathi madhe माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण diwali nibandh in marathi या लेखाचा वापर diwali essay in marathi for class 5 6 8 असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

मराठी All

दिवाळी निबंध 10 ओळी | Diwali Essay in Marathi 10 Lines

नमस्कार मित्रांनो. या लेखात आम्ही दिवाळी निबंध 10 ओळी मध्ये लिहिला आहे. अगदी इंग्रजी माध्यमासाठीही, Diwali Essay in Marathi 10 Lines मध्ये विचारला जाऊ शकतो.

दिवाळी निबंध 10 ओळी – संच १

  • दिवाळी हा भारतात साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे.
  • वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयामध्ये त्याचे सांस्कृतिक महत्त्व आहे.
  • दिवाळीत दिव्यांची रोषणाई म्हणजे नकारात्मकता दूर करणे आणि सकारात्मक ऊर्जेची सुरुवात होय.
  • या सणामध्ये घराची बारकाईने साफसफाई करणे आणि नवीन वस्त्रे परिधान करणे यांचा समावेश होतो, या दोन्ही गोष्टी सौभाग्य आणि समृद्धी आकर्षित करतात असे मानले जाते.
  • दिवाळीचा स्वयंपाकाचा पैलू तितकाच आनंददायी आहे, ज्यामध्ये स्वादिष्ट मिठाई आणि फराळांचा भरपूर समावेश आहे.
  • दिवाळीत भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्यासाठी कुटुंबे एकत्र येतात, आनंद आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करतात.
  • दिवाळीचा एक अनोखा कलात्मक पैलू म्हणजे क्लिष्ट रांगोळीची निर्मिती, जी घरांच्या प्रवेशद्वारांना सुशोभित करते आणि उत्सवाच्या वातावरणात भर घालते.
  • दिवाळी ही व्यक्तींमधील प्रेम, एकजूटता आणि दयाळूपणाचे महत्त्व लक्षात आणून देणारी आहे.
  • एकता, सकारात्मकता आणि अंधारावर प्रकाशाच्या चिरंतन विजयाच्या चिरस्थायी मूल्यांचा पुरावा म्हणून दिवाळी उभी आहे.
  • एकंदरीत, दिवाळी हा प्रेम सामायिक करण्याचा, कौटुंबिक बंध दृढ करण्याचा आणि सर्वांमध्ये सद्भावना वाढवण्याचा सण आहे.

माझा आवडता सण दिवाळी निबंध 10 ओळी – संच २

  • दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि त्याला हजारो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक महत्त्व आहे.
  • भारतीय पौराणिक कथेतील एक आदरणीय व्यक्तिमत्व भगवान रामाच्या काळात त्याचा उगम झाला असे मानले जाते, जे राक्षस राजा रावणाचा पराभव करून त्यांच्या राज्यात परतले.
  • त्यांच्या विजयी पुनरागमनाची परंपरा दिव्यांच्या रोषणाईने साजरी करण्यात आली.
  • कालांतराने, भारतातील सांस्कृतिक मूल्ये प्रतिबिंबित करणाऱ्या विविध पद्धतींचा समावेश करण्यासाठी दिवाळी विकसित झाली आहे.
  • दिवे आणि मेणबत्त्या पेटवण्याव्यतिरिक्त, फटाके हा उत्सवाचा अविभाज्य भाग आहे, जो देखावा आणि उत्सवात भर घालतो.
  • दिवाळी दरम्यान भेटवस्तूंची देवाणघेवाण प्रियजनांसोबत आनंदाची देवाणघेवाण करण्याची परंपरा दर्शवते.
  • दिवाळी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात राहणारे भारतीय साजरी करतात.
  • पाच दिवसांच्या दिवाळी सणात प्रत्येक दिवशी विशिष्ट विधी समाविष्ट असतात, जसे की संपत्ती आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करणे.
  • या प्रथा भारतीय परंपरांच्या गहनतेचा आणि विविधतेचा पुरावा आहेत.
  • एकंदरीत, दिवाळी हा भारताच्या सांस्कृतिक आणि इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे, जो वाईटावर चांगले, एकता आणि अंधारावर प्रकाशाचा कालातीत विजय या चिरस्थायी मूल्यांचा उत्सव साजरा करतो.

Diwali Essay in Marathi 10 Lines – संच ३

  • दिवाळी, ज्याला दीपावली देखील म्हणतात, भारतातील विविध समुदायांद्वारे साजरी केली जाते.
  • दिवाळीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सजावटीच्या आणि रंगीबेरंगी रांगोळीची निर्मिती, जी रंगीत पावडर, तांदूळ आणि फुलांच्या पाकळ्यांसह विविध साहित्य वापरून तयार केली जाते.
  • दिवाळीचा सण देखील भारतीय व्यावसायिक वर्षाच्या प्रारंभास सूचित करतो, अनेक व्यापारी आणि व्यापारी या दिवशी त्यांची नवीन लेखा पुस्तके सुरू करतात, ज्याला “चोपडा पूजन” म्हणून ओळखले जाते.
  • ऐतिहासिकदृष्ट्या, दिवाळीचे अनेक अर्थ आणि मूळ आहेत.
  • भारताच्या काही भागांमध्ये, भगवान कृष्णाने नरकासुराचा पराभव केल्याच्या दिवसाचे स्मरण केले जाते, तर काही भागांमध्ये, हे देवी कालीला समर्पित आहे.
  • दिवाळी हा धार्मिक सीमा ओलांडून विविध धर्म आणि पार्श्वभूमीच्या लोकांना एकत्र करणारा एक धर्मनिरपेक्ष सण बनला आहे.
  • दिवाळी हा असा काळ आहे जेव्हा सर्व वयोगटातील व्यक्ती अज्ञान आणि अंधारावर प्रकाश, ज्ञान आणि सत्याचा विजय साजरा करण्यासाठी एकत्र येतात.
  • दिवाळीत फटाके फोडण्याची परंपरा आहे.
  • थोडक्यात, दिवाळी हा केवळ सण नाही; हे सामायिक वारसा आणि मूल्यांचे प्रतिबिंब आहे.
  • दिवाळी भारतातील वैविध्यपूर्ण लोकांना बांधून ठेवते, प्रत्येकाला चांगुलपणा, एकता आणि आपल्या जीवनातील अंधार दूर करणार्‍या चिरंतन तेजाच्या चिरस्थायी तत्त्वांची आठवण करून देते.

माझा आवडता सण दिवाळी निबंध 10 ओळी – संच ४

  • दिवाळी हा भारतातील अनेक लोकांद्वारे साजरा केला जाणारा एक विशेष सण आहे.
  • याला मोठा इतिहास आहे आणि तो दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो.
  • दिवाळी ही वाईटावर चांगल्याचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवते.
  • लोक दिवे, मेणबत्त्या लावतात आणि रंगीबेरंगी रांगोळीने आपली घरे सजवतात.
  • स्वादिष्ट मिठाई आणि जेवण वाटण्यासाठी कुटुंबे एकत्र येतात.
  • प्रेम दाखवण्याची आणि इतरांना क्षमा करण्याची, आनंद पसरवण्याची ही वेळ आहे.
  • लोक देवी-देवतांची पूजा करतात, विशेषत: देवी लक्ष्मी, जी संपत्ती आणि समृद्धी आणते.
  • दिवाळीच्या उत्सवात फटाक्यांनी रात्रीचे आकाश उजळून निघते.
  • या उत्सवादरम्यान भेटवस्तूंची देवाणघेवाण ही एक सामान्य परंपरा आहे.
  • दिवाळी हा प्रेमाचा, एकत्र येण्याचा आणि आपल्या जीवनातील चांगुलपणा साजरा करण्याचा काळ आहे.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला दिवाळी निबंध 10 ओळी चे आवडले असतील. आम्हाला तुमचा diwali essay in marathi 10 lines साठीचा अभिप्राय कळवा.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Marathi Essay Topics

मराठी निबंध क्र.19

दिवाळी निबंध मराठी | Diwali Nibandh Marathi

दिवाळी निबंध मराठी

  • दिवाळी: प्रकाशाचा सण
  • दिवाळीची पौराणिक पार्श्वभूमी
  • लक्ष्मीपूजन
  • दिवाळीचे समकालीन महत्त्व
  • पर्यावरण आणि सुरक्षा
  • दिवाळीतील आनंद आणि उत्साह

Diwali Nibandh Marathi दिवाळी: प्रकाशाचा सण

दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हटले जाते, हा भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंददायी सण आहे. तो प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो आणि अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. या निबंधात आपण दिवाळीच्या उत्पत्ती, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व, साजरी करण्याच्या पद्धती आणि सध्याच्या काळातील त्याचे महत्त्व यावर प्रकाश टाकणार आहोत.

दिवाळी निबंध मराठी दिवाळीची पौराणिक पार्श्वभूमी

दिवाळी हा सण, हिंदू धर्मात फार खोलवर रुजलेला सण आहे. या सणाशी संबंधित सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर आणि 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्यानंतरची आहे.

या दिवशी भगवान श्रीराम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मणासह चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परतले होते. अयोध्येतील लोकांनी राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या स्वागतासाठी संपूर्ण आयोध्या नगरीच्या रस्त्यांवर आणि त्यांच्या घरांमध्ये तेलाचे दिवे लावले, ज्यामुळे दिवे लावण्याची परंपरा तेव्हापासूनच सुरू झाली.

दिवाळीशी संबंधित आणखी एक महत्त्वाची कथा म्हणजे भगवान कृष्णाने नरकासुर राक्षसावर विजय मिळवल्याची आहे. हा विजय नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो, जो दिवाळीच्या एक दिवस आधी येत असतो. याशिवाय, दिवाळी ही लक्ष्मीपूजनाची रात्र असते, ज्यामध्ये श्री लक्ष्मी देवी, संपत्ती आणि समृद्धीची देवीची आपल्या सर्वांकडून पूजा केली जाते व चांगले आशीर्वाद मागितले जातात.

दिवाळीच्या तयारीची सुरुवात घरांची साफसफाई करून केली जाते. घरातील सर्व कानेकोपरे साफ केले जातात तसेच आपापल्या मोटारसायकलही स्वच्छ धुतल्या जातात. लोक आपली घरे स्वच्छ करतात आणि रंगवतात, कारण असा विश्वास आहे की स्वच्छ घरात नेहमी देवी लक्ष्मी येते. घरांच्या प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढल्या जातात, ज्यामुळे घराचे सौंदर्य वाढते आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी घरे आणि रस्ते दिव्यांनी सजवले जातात. सर्वीकडे अगदी प्रकाशच प्रकाश दिसत असतो.

दिवाळी निबंध मराठी लक्ष्मीपूजन

दिवाळीच्या मुख्य दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. या वेळी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्तींना फुलांनी सजवून त्यांची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाच्या वेळी संपूर्ण घरात दीप प्रज्वलित केले जातात आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश पसरवला जातो. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येते असा आपल्या सर्वांचा विश्वास आहे.

दिवाळीच्या निमित्ताने घराघरात विविध प्रकारच्या मिठाई आणि फराळ बनवले जातात. लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, आणि अनेक प्रकारचे मिठाईचे पदार्थ या सणाच्या मुख्य आकर्षणांपैकी आहेत. लोक एकमेकांना मिठाई वाटून सणाच्या आनंदात सहभागी होतात.

दिवाळीच्या सणात फटाके फोडण्याची परंपरा आहे. फटाक्यांच्या आवाजाने आणि प्रकाशाने अंधार दूर होतो आणि वातावरण आनंदमय होते. तथापि, सध्या पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून फटाके फोडण्याचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे लोक अधिक सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरा करण्याचा विचार करत आहेत.

दिवाळी निबंध मराठी दिवाळीचे समकालीन महत्त्व

दिवाळी हा सण लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक एकता निर्माण करतो. या सणाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात, एकमेकांना शुभेच्छा देतात आणि आनंद साजरा करतात. विविध धर्म आणि जातीच्या लोकांमध्ये बंधुता वाढवण्याचे काम दिवाळी करते. या सणाच्या निमित्ताने लोक आपले भेदभाव विसरून एकत्र येतात आणि एकमेकांशी स्नेहभाव वाढवतात.

दिवाळी हा सण भारतीय अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम करतो. या सणाच्या निमित्ताने खरेदी-विक्रीचा व्याप वाढतो. लोक नवीन कपडे, दागिने, घरगुती वस्तू आणि भेटवस्तू खरेदी करतात. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. अनेक उद्योग, व्यापार आणि लघु उद्योजकांना दिवाळीच्या सणामुळे मोठा फायदा होतो.

दिवाळी निबंध मराठी पर्यावरण आणि सुरक्षा

सध्याच्या काळात पर्यावरण संरक्षणाची गरज वाढली आहे. फटाके फोडल्याने होणारे प्रदूषण आणि अपघातांच्या घटनांमुळे पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याची आवश्यकता आहे. लोक आता पर्यावरणस्नेही पर्यायांचा विचार करीत आहेत, जसे की दिव्यांच्या ऐवजी कंदिल आणि बत्त्या वापरणे, फटाके न फोडणे आणि पर्यावरणपूरक सजावट करणे. यामुळे सणाचा आनंद कायम ठेवूनही पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते.

दिवाळी निबंध मराठी दिवाळीतील आनंद आणि उत्साह

दिवाळी हा सण कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने दूर राहणारे नातेवाईक आणि मित्र एकत्र येतात. एकत्र येऊन सण साजरा केल्याने आपुलकी वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये स्नेहभाव वाढतो. कुटुंबातील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या सणाचा आनंद लुटतात.

दिवाळीच्या निमित्ताने स्नेहभोजन आणि पार्टीचे आयोजन केले जाते. मित्रमंडळी आणि कुटुंबातील सर्व सदस्य मग ते कितीही घरापासून दूर असतील तरीही दिवाळी साजरी करण्यासाठी ते आपल्या गावी जरूर येतात, एकत्र येऊन विविध पदार्थांचा आस्वाद घेतात. या निमित्ताने पूर्ण परिवार एकत्रित येऊन गप्पा मारतात, गाणी गातात आणि नृत्य करतात, यामुळे सणाचा आनंद अधिकच वाढतो.

दिवाळीच्या निमित्ताने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात जसे कि, गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे, अनाथाश्रमातील मुलांना भेटवस्तू आणि मिठाई वाटणे, वृद्धाश्रमातील वृद्धांना सणाचा आनंद देणे असे अनेक उपक्रम हाती घेतले जातात. या उपक्रमांमुळे समाजातील दुर्बल घटकांनाही सणाचा आनंद मिळतो.

दिवाळी निबंध मराठी निष्कर्ष

दिवाळी हा सण केवळ प्रकाशाचा सण नसून, तो अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. या सणाच्या निमित्ताने लोकांमध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक एकता वाढते, भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि पर्यावरण संरक्षणाची आवश्यकता समजते. दिवाळीच्या सणाने आपले जीवन अधिक प्रकाशमय, आनंदमय आणि समृद्ध करणारे आहे. या सणाच्या माध्यमातून आपण आपल्या परंपरा आणि संस्कृतीची जपणूक करतो आणि त्यांना पुढील पिढीपर्यंत पोहचवतो. दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देऊ आणि सणाचा आनंद साजरा करू.

Follow on Pinterest

 भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

(Top 5) दिवाळी निबंध मराठी | Diwali Essay in Marathi

मित्रांनो भारतीयांचा प्रमुख सण दिवाळी भारतासह जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी दरम्यान चारही बाजूंना उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहावयास मिळते. आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 4 उत्तम Diwali Essay in Marathi -  दिवाळी निबंध मराठी शेअर करीत आहोत.

या लेखात देण्यात आलेले दिवाळी चे निबंध 100, 200, 300, 400 शब्द प्रकारात देण्यात आलेले आहेत. यापैकी आपल्याला आवश्यक असलेला निबंध आपण घेऊ शकता आणि त्याचा उपयोग करू शकतात. तर चला  Diwali Essay in Marathi ला सुरूवात करूया. 

short essay on diwali in marathi

दिवाळी 10 ओळी निबंध - Diwali essay in marathi 10 lines

  • दिवाळी हा सण भारतात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
  • भारतासह हा सण जगभरात राहणारे भारतीय देखील साजरा करतात.
  • दिवाळीला दिव्यांचा सण म्हणूनही ओळखले जाते.
  • दिवाळी येण्याआधी घराची व दुकानाची स्वच्छता केली जाते. 
  • दिवाळी च्या सणाला दिवे लाऊन प्रार्थना केली जाते. 
  • आम्ही दिवाळीच्या दिवशी आमची घरे रंगीबेरंगी रांगोळ्या, झेंडूच्या माळा आणि अनेक दिव्यांनी सजवतो.
  • या दिवशी स्वादिष्ट मिठाई आणि इतर छान छान पदार्थ बनवले जातात.
  • दरवर्षी दिवाळी ला माझे आई वडील मला नवीन कपडे घेऊन देतात. 
  • या दिवशी आम्ही मित्र आणि नातेवाईक मंडळींना मिठाई देतो. 
  • दिवाळी च्या सणाला कोणीही दुखी राहू नये म्हणून माझे वडील दरवर्षी गरिबांना मिठाई आणि गिफ्ट देत असतात.

दिवाळी निबंध मराठी - Diwali Essay in Marathi

(100 शब्द ) 

दिवाळी हा आपल्या भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. त्रेतायुगात भगवान श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्याच्या आनंदात अयोध्येत घरोघरी सर्वत्र दिवे लावले गेले, त्यामुळे संपूर्ण अयोध्या स्वर्गासारखी उजळून निघाली. श्री रामांचे अयोध्येतील आगमन म्हणूनच दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळीचा सण प्रत्येकासाठी आनंद घेऊन येतो, मग व्यक्ति मोठा असो वा लहान सर्वजण खूप उत्साहाने दिवाळी साजरी करतात. दिवाळी दरम्यान  शाळा, कॉलेजांना  सुट्ट्या दिल्या जातात. दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते.

दिवाळीचा सण फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेरही अनेक देशांमध्ये खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. सर्वत्र दिवे आणि आकाशकंदील लावले जातात, रांगोळ्या काढल्या जातात, फटाके फोडले जातात आणि स्वादिष्ट फराळही केला जातो. 

अशा प्रकारे दिवाळी हा एक आनंदाचा उत्सव आहे जो आपल्या जीवनात आनंद, प्रेम आणि बंधुता पसरवतो.

दिवाळीचा सण निबंध - Diwali Festival Essay in Marathi

दिव्यांचा सण म्हणून ओळखला जाणारा दिवाळी हा भारतातील सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे. दिवाळी सणाला भारताच्या काही भागांमध्ये ‘दिपावली’ म्हणूनही ओळखले जाते. 

भगवान श्रीराम यांनी १४ वर्षांच्या वनवासादरम्यान रावणाचा वध करून अधर्मावर विजय मिळवला आणि अयोध्येला परत आले, तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी दिवे लावले. व मान्यतेनुसार तेव्हापासूनच दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळीची तयारी काही दिवस आधीपासून सुरू होते. या शुभ सोहळ्यासाठी घरे आणि दुकाने स्वच्छ केली जातात, घरांना रंग देऊन त्याचे नूतनीकरण केले जाते. लोक नवीन कपडे, दागिने, दिवे, मिठाई खरेदी करतात. यादरम्यान सर्वत्र अत्यंत उत्साहाचे वातावरण असते. 

धनत्रयोदशी पासून भाऊबीजपर्यंत ५ दिवस दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली जाते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे दिवाळीचे पाच दिवस प्रत्येक घरी आनंद घेऊन येतात. 

दिवाळीच्या दिवशी, लोक नवनवीन कपडे आणि दागिने परिधान करतात, घरोघरी रांगोळ्या काढल्या जातात. घरातील खोल्या, बाल्कनी आणि बागांमध्ये दिवे आणि आकाशकंदील लावून सजावट केली जाते. यामुळे घर अगदी उजळून निघते. घरी स्वादिष्ट फराळ केला जातो. शेव, चकली, चिवडा, शंकरपाळे असा फराळ अतिशय चवीने खाल्ला जातो आणि इतरांनाही दिला जातो.

दिवाळी हा अनेक शतकांपासून संपूर्ण भारतातील लोकांद्वारे साजरा केला जाणारा आनंददायक सण आहे. दिवाळी केवळ घरांनाच नव्हे तर लोकांच्या आत्म्याला देखील प्रकाश देते. असा हा सण समाजातील लोकांना जवळ आणतो आणि आपल्यामध्ये एकतेची भावना निर्माण करतो.

वाचा> माझा आवडता सण दिवाळी निबंध

मराठी निबंध दिवाळी - Diwali Essay in Marathi

भारतात सणांची गौरवशाली परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. घरातील अंधार दूर करून दिव्यांचा प्रकाश पसरवणारी दिपावली किंवा दिवाळी सर्व सणांमध्ये सर्वात मुख्य सण आहे. 

लंका-विजयानंतर प्रभू श्रीराम अयोध्येला परतले तेव्हा अयोध्यावासीयांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून हा उत्सव लोकप्रिय झाला. महाराज युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ याच दिवशी पूर्ण झाला होता, तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो, असेही मानले जाते. काही लोक दिवाळीला भगवान महावीरांचा निर्वाण दिवस मानतात. अशा प्रकारे दिवाळीच्या सणात प्रत्येक भारतीयाला आत्मीयता जाणवते.

दिवाळी आपल्याबरोबर स्वच्छता आणि सजावटीचा सुवर्ण संदेश घेऊन येते. दिवाळी येण्याच्या काही दिवस आधीच, लोक आपली घरे साफ करण्यास सुरवात करतात. लोक नवीन कपडे खरेदी करतात  आणि दागिनेही खरेदी करतात. घरगुती मिठाई आणि पदार्थ तयार केले जातात. अशाप्रकारे दिवाळीच्या आगमनापूर्वी सर्वत्र उत्साहाची आणि जल्लोषाची लाट उसळते.

धनत्रयोदशी पासून भाऊबीजेपर्यंत ५ दिवस दिवाळी अगदी उत्साहात साजरी केली जाते. घरोघरी दिवे, आकाशकंदील आणि विजेचे बल्ब पेटवले जातात. फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण दुमदुमून जाते. धनत्रयोदशीला लोक धनाची आणि संपत्तीची पूजा करतात. चतुर्दशीला 'नरक चतुर्दशी' असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या असूराचा वध केला होता.

अमावास्येचा दिवस म्हणजे दिवाळीचा मुख्य दिवस. या दिवशी लक्ष्मीपूजन असते. याच दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते आणि व्यापारी नवीन हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात. नवीन विक्रम वर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते. या दिवशी लोक आपल्या नातेवाईकांना भेटतात आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाचे औक्षण करते आणि त्याला मिठाई खाऊ घालते. भाऊ बहिणीला काही भेटवस्तू देतो.

काही लोक दिवाळीच्या दिवशी पत्ते खेळतात. दिवाळीत खूप फटाके फोडले जातात. यामुळे काहीवेळा भीषण आग लागण्याच्या घटना घडतात. म्हणून आपण फटाके फोडताना काळजी घेतली पाहिजे.

दिवाळीच्या प्रकाशाने आपले घर, अंगण आणि त्याचबरोबर आपले मनही उजळून निघते. आपल्या हृदयातून दुसऱ्यांबद्दल असलेला राग, द्वेष आणि दुरावा काढून टाकला जातो. आपले मन प्रेमाने भरले जाते. यातून सर्वांना नवचैतन्य प्राप्त होऊन आपली कर्तव्ये पार पाडण्याचे बळ मिळते.

हे दीपमालिके, आनंद आणि प्रकाशाची देवी! तुझे नेहमीच स्वागत आहे!

दिवाळी मराठी निबंध - Diwali Composition in Marathi

कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरा होणारा दीपावली हा सण केवळ हिंदू धर्मासाठीच नाही तर जैन, बौद्ध, शीख इत्यादी धर्मांसाठीही महत्त्वाचा आहे. हा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आणि सांस्कृतिक श्रद्धा आहेत.

आपल्या देशातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक, दीपावली किंवा दिवाळी म्हणजे पाच दिवसांचे महापर्वच आहे, हा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि भाऊबीजेपर्यंत चालतो, या सर्व दिवसांचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे, यामागे पौराणिक आणि धार्मिक कथा जोडल्या आहेत.

दिवाळीच्या दिवशी लोक आपली घरांची, दुकानांची साफ-सफाई करतात. घरांना रंग लावतात आणि या निमित्ताने नवीन कपडे, भेटवस्तू, भांडी, मिठाई इत्यादी खरेदी करतात. नवीन दुकाने आणि घरे घेण्यासाठी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिवाळी एक शुभ दिवस मानला जातो.  Diwali Essay in Marathi

दिवाळीच्या पहिल्या दिवशी येते धनत्रयोदशी. हा दिवस घरासाठी काही खरेदी करण्याचासाठी शुभ मानला जातो. या दिवशी धनाची पूजा केली जाते आणि लोक सोने, चांदी यांचीही खरेदी करतात. लोक हा दिवस नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही अनुकूल मानतात.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला होता. हा वध अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे.

तिसरा दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा. हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी लोक रांगोळी आणि दिव्यांनी घर सजवून संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि गणेश ही शुभ सुरुवातीची देवता मानली जाते.

दिवाळीला लोक रस्ते, बाजारपेठा, घरे आणि आजूबाजूच्या परिसरात समृद्धी आणि कल्याणासाठी मातीचे दिवे लावतात.

यावेळी फटाके हे प्रमुख आकर्षण असते. घरात बनवलेला स्वादिष्ट फराळ खाल्ला जातो आणि शेजारी, मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना सुद्धा दिला जातो. 

लक्ष्मीपूजनाच्या रात्री १२ वाजेपर्यंत लोक लक्ष्मीच्या दर्शनासाठी आतुरतेने घराचे दरवाजे उघडे ठेवतात.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा आणि गोवर्धन पूजेचा दिवस.

याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने इंद्राचा पराभव केला आणि इंद्र पाडत असलेल्या मुसळधार पावसापासून ग्रामस्थ आणि गुरेढोरे यांना वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या एका करंगळीवर उचलला होता. 

उत्तर भारतात सायंकाळी खत, ऊस, पुस्तके, शस्त्रे व उपकरणे इत्यादींची पूजा या निमित्ताने केली जाते.

महाराष्ट्र, तमिळनाडू आणि कर्नाटकातील लोक हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा करतात ज्यात भगवान श्रीविष्णूंच्या  वामन अवताराने राक्षस राजा बळीवर मिळवलेल्या विजयाची आठवण काढली जाते.

भाऊबीजेचा दिवस हा दिवाळीचा शेवटचा दिवस. हा दिवस भाऊ-बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक आहे. बहीण आपल्या भावाचे औक्षण करते आणि त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतात.

दिवाळीचा सण देशभरातील सर्व लोक अतिशय उत्साहाने साजरा करतात. मुलांना सणाचा आनंद लुटता यावा म्हणून शाळा, महाविद्यालयात काही दिवस सुट्टी दिली जाते. बँका नवीन योजना आणि व्याजदर देतात. दरवर्षी या निमित्ताने मोठ्या बजेटचे नवीन चित्रपट प्रदर्शित होतात.

दिवाळीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. यामुळे आग लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे आपण फटाके फोडताना कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 

दिवाळी हा उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपल्या हृदयातून दुसऱ्यांबद्दल असलेला राग, द्वेष आपण काढून टाकला पाहिजे आणि सर्वत्र प्रेम आणि आनंद पसरवला पाहिजे. 

तर मित्रहो वरील लेखात आम्ही आपल्यासाठी 4 वेगवेगळी शब्ददमर्यादा असणारे दिवाळी मराठी निबंध दिले आहेत. आशा आहे हे  Diwali Essay in Marathi आपणास उपयोगी ठरले असतील.  diwali festival essay in marathi   आपण आपल्या शालेय कार्यासाठी उपयोगात घेऊ शकतात. तसेच परीक्षेत देखील आपणास दिवाळी सण मराठी निबंध विचारला जातो, तर तेथे देखील हा निबंध उपयोगी ठरू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

  • Privacy Policy
  • Terms and Conditions

MARATHI18.com LOGO

दिवाळी निबंध मराठी | Diwali Essay in Marathi

Diwali Essay in Marathi : दिवाळी हा हिंदूंच्या सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे जो मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. मुलांना सणाबद्दल आनंददायक अनुभव सांगण्याची संधी मिळाल्यावर त्यांना दिवाळीला दिवाळी निबंध मराठी लिहायला सांगितले जाते.

दिवाळीवरील मराठी निबंध मुलांना त्यांचे विचार व्यक्त करण्यास आणि शुभ सणाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त करण्यास मदत करतो. मुले खाली दिलेला दिवाळी सणावरील निबंध पाहू शकतात आणि पवित्र सणाविषयी त्यांचे वैयक्तिक अनुभव व्यक्त करण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी या विषयावर काही ओळी लिहू शकतात.

येथे लहान मुलांसाठी दिवाळी निबंध मराठी दिले आहेत ज्याचा संदर्भ तरुण स्वत: निबंध तयार करताना घेऊ शकतात.

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी

Table of Contents

दिवाळीचा सण मोठा, आनंदाला नाही तोटा, असे आपण नेहमीच म्हणत असतो. दिवाळीचा सण म्हणजे लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच आनंदाची पर्वणी असतो. हा सण प्राचीन काळापासून आपल्या भारतात साजरा करतात. आज कित्येक परकीय लोकही दिवाळी साजरी करतात.

दिवाळीच्या या सणाला ऐतिहासिक परंपरा आहे. प्रभूरामचंद्रांनी विजयादशमी दिवशी रावणाचा वध केला आणि सीतेसह पुष्पक विमानातून अयोध्येला परतले. प्रजेने सगळीकडे दीप उजळले. तो हाच दिवस. आजही दिवाळीदिवशी लोक दीप लावतात. आकाश कंदील लावतात. लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सारेच आनंदात सामील होतात. फटाके, फुलबाजे लावून आपला आनंद व्यक्त करतात.

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. यादिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. सगळेजण अभ्यंगस्नान करुन मनोभावे लक्ष्मीची पूजा करतात. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी, भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला, तो हाच दिवस. आश्विन शुद्ध चतुर्दशीला नरकचतुर्दशी साजरी करतात. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे अमावस्येदिवशी व्यापारी लोक मोठ्या थाटामाटाने लक्ष्मीपूजन करतात.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा धर्मनिष्ठ व उदार बळीराजाने या दिवशी यज्ञ करून प्रतिकारशक्ती मिळवली होती. भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. भाऊ आपल्या कुवतीप्रमाणे बहिणीला आहेर करतो. काहीतरी भेट देतो. दिवाळीचा फराळ तर पहिल्या दिवसापासून चालूच असतो.

दिवाळी निबंध मराठी-Diwali Essay in Marathi-माझा आवडता सण दिवाळी

Diwali Nibandh Marathi – दिवाळी निबंध मराठी

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. हा प्रामुख्याने भारतात साजरा होणारा सर्वात मोठा आणि भव्य सण आहे. दिवाळी हा सण आनंद, विजय म्हणून साजरा केला जातो. दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हणतात, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येते. दसरा सण २० दिवस साजरा केला जातो. ‘दीपावली’ हा एक हिंदी शब्द आहे ज्याचा अर्थ दिव्यांची सरणी आहे (‘दीप’ म्हणजे मातीचे दिवे आणि ‘अवली’ म्हणजे रांग किंवा सरणी).

प्रभू रामचंद्रांच्या स्मरणार्थ दिवाळी साजरी केली जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार, असे मानले जाते की या दिवशी भगवान राम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. या वनवास कालावधीत, तो राक्षसांसह आणि लंकेचा शक्तिशाली शासक रावणाशी लढला. राम परतल्यावर, अयोध्येतील लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांचा विजय साजरा करण्यासाठी दिवे पेटवले. तेव्हापासून, वाईटावर चांगल्याचा विजय घोषित करण्यासाठी दिवाळी साजरी केली जाते.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला लोक लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात. तसेच ऐश्वर्य आणि समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा दिवाळीनिमित्त केली जाते. दिवाळीच्या पूजेला या देवतांचे आशीर्वाद मिळतात असे म्हटले जाते.

दिवाळी सणाची तयारी दिवाळीच्या अनेक दिवस आधी सुरू होते. त्याची सुरुवात घरे आणि दुकाने यांच्या पूर्ण स्वच्छतेने होते. बरेच लोक सण सुरू होण्यापूर्वी सर्व जुन्या घरातील वस्तू टाकून देतात आणि नूतनीकरणाची सर्व कामे करून घेतात.

दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी लोकांच्या घरी जाऊन त्यांना आशीर्वाद देते, अशी जुनी समजूत आहे. म्हणून, सर्व भाविक उत्सवासाठी दिवे, फुले, रांगोळी, मेणबत्त्या, हार इत्यादींनी आपली घरे स्वच्छ करतात आणि सजवतात.

दिवाळी हा सण साधारणपणे तीन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवसाला धनत्रयोदशी म्हणतात ज्या दिवशी नवीन वस्तू, विशेषतः दागिने खरेदी करण्याची परंपरा आहे. पुढचे दिवस दिवाळी साजरी करायची असते जेव्हा लोक फटाके फोडतात आणि त्यांच्या घरांना सुशोभित करतात. आपल्या मित्रांना आणि कुटुंबांना भेट देण्याची आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याची प्रथा देखील आहे. यानिमित्ताने भरपूर मिठाई आणि भारतीय पदार्थ तयार केले जातात.

दिवाळी सणाचा सर्वांनीच आनंद घेतला पाहिजे. सर्व सणांमध्ये, फटाके फोडल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण होते हे आपण विसरतो. हे मुलांसाठी खूप धोकादायक असू शकते आणि अगदी जीवघेणा देखील होऊ शकते. फटाके फोडल्याने हवेचा दर्जा निर्देशांक आणि दृश्यमानता कमी होते जे अनेक ठिकाणी अपघातांसाठी जबाबदार असतात जे सणानंतर वारंवार नोंदवले जातात. त्यामुळे सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे महत्त्वाचे आहे.

दिवाळीला संपूर्ण जग उजळून निघते म्हणून दिवाळीला उजेडाचा सण म्हटले जाते. सण आनंद आणतो आणि म्हणूनच, दिवाळी माझा आवडता सण आहे!

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी – Short Essay On Diwali in Marathi

दिवाळीचा सण मोठा आनंदाला नाही तोटा असे आपण नेहमीच म्हणत असतो. दिवाळीचा सण म्हणजे लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच आनंदाची पर्वणी असतो. हा सण प्राचीन काळापासून आपल्या भारतात साजरा करतात. आज कित्येक परकीय लोकही दिवाळी साजरी करतात.

दिवाळी निबंध मराठी १०० शब्द – Diwali Essay in Marathi 100 Words

भारत हा सणांचा देश आहे. आपल्या देशात अनेक सण मोठ्या आनंदाने आणि आनंदाने साजरे केले जातात. दिवाळी हा आपल्या देशातील सर्वात मोठा सण आहे. याला दिवाळी किंवा दीपावली असेही म्हणतात. दिवाळी माणसाच्या आयुष्यात सुख, आनंद, शांती, आरोग्य, ऐश्वर्य, यश आणि समृद्धी घेऊन येवो.

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि या दिवशी जवळजवळ प्रत्येक घर आणि रस्ता दिव्यांनी सजवला जातो. लोक आपली घरे स्वच्छ करतात, त्यांना दिवे, रांगोळीने सजवतात आणि मुले या दिवशी फटाके फोडतात.

या दिवशी प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले म्हणून आपण दिवाळी साजरी करतो. अयोध्येच्या लोकांनी तेलाचे दिवे लावून त्यांचे स्वागत केले.

दिवाळीच्या दिवशी आपण आपल्या भविष्यासाठी लक्ष्मीची प्रार्थना करतो. मिठाई आणि फराळ प्रत्येक घरात बनवला जातो. लोक नवीन कपडे घालतात, मिठाईची देवाणघेवाण करतात आणि त्यांचे मित्र आणि नातेवाईकांना शुभेच्छा देतात.

दिवाळी हा सण आपल्याला प्रेम, मैत्री आणि बंधुभावाचा संदेश देतो. त्यामुळे दिवाळीला आपण गरजू व्यक्तींना नवीन कपडे, मिठाई आणि पैसे दिले पाहिजेत, जेणेकरून त्यांनाही या सणाचा आनंद घेता येईल.

Diwali Nibandh Marathi-दिवाळी निबंध

दिवाळी निबंध मराठी २०० शब्द – Diwali Essay in Marathi 200 Words

भारत हा सणांचा देश आहे. भारतात वर्षभर अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी एक दिवाळी आहे. दिवाळी किंवा दीपावली हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. हा सण ‘दिव्यांचा उत्सव’ म्हणून ओळखला जातो. १४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान रामाच्या राज्यात परत येण्याच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी अयोध्येतील जनतेने संपूर्ण राज्यात दिवे लावून आपला आनंद व्यक्त केला होता. वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते.

लोक हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात. प्रत्येक ठिकाणे प्रकाशाने भरण्यासाठी लोक आपले घर आणि मार्ग मातीच्या दिव्याने उजळवतात. संध्याकाळी लोक देवी लक्ष्मी आणि गणपतीची प्रार्थना करतात आणि नंतर मुले फटाके फोडतात. नातेवाईक आणि मित्रांमध्ये मिठाई, भेटवस्तू वाटून हा सण साजरा केला जातो.

हा सण हिंदूंसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि दरवर्षी ते या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. हा सण आपल्याला वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा खूप चांगला धडा देतो. हा धडा प्रत्येकाने आपल्या जीवनात लागू केला पाहिजे आणि जुगारासारखे वाईट कृत्य न करता हा आनंदाने साजरा केला पाहिजे.

दिवाळी निबंध मराठी ३०० शब्द – Diwali Essay in Marathi 300 Words

भारत हा सणांचा देश आहे आणि दिवाळी हा भारतातील हिंदूंनी साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. हा सण कार्तिक अमावस्या या हिंदू महिन्यात साजरा केला जातो जो ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येतो. “दीप” च्या विशेष सणामुळे, याला दीपावली आणि दिवाळी असे नाव देण्यात आले आहे. दीपावली म्हणजे दिव्यांची ओढ.

दिवाळीचा सण साजरा करण्यामागचे एक मोठे कारण म्हणजे लंकेचा राक्षस राजा रावणावर मोठा विजय मिळवून सीता आणि लक्ष्मणासोबत १४ वर्षांच्या वनवासानंतर प्रभू राम अयोध्येला परतले. त्यांच्या विजयाच्या आणि आगमनाच्या आनंदात अयोध्यावासीयांनी संपूर्ण शहर तुपाच्या दिव्याने उजळले. म्हणूनच वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. त्या दिवसापासून, दरवर्षी भारतीय लोक दीप प्रज्वलित करून आणि एकमेकांना मिठाई खाऊ घालून आपला आनंद व्यक्त करतात.

दिवाळीच्या काही दिवस आधी घर, दुकान आणि कार्यालय स्वच्छ केले जाते कारण असे मानले जाते की त्यानंतर दिवाळीच्या दिवशी घर, दुकान आणि कार्यालय स्वच्छ ठेवून लक्ष्मी माता येते. या दिवशी सर्व लोक बाजारातून भेटवस्तू, मिठाई, फटाके आणि नवीन कपडे खरेदी करतात.

हिंदू कॅलेंडरनुसार सूर्यास्तानंतर लोक देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात. पूजा पूर्ण झाल्यानंतर, ते भेटवस्तू एकमेकांना देतात. संध्याकाळी पूजा केल्यानंतर ते दिव्यांनी घरे सजवतात. शेवटी घरातील सदस्य फटाके फोडून दिवाळी साजरी करतात.

दिवाळी हा प्रत्येकासाठी महत्वाचा सण आहे कारण तो लोकांना आनंद आणि आशीर्वाद देतो. या दिवशी लोक वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी लावतात. यामुळे दिवाळीत चांगल्यावर वाईटाचा विजय होऊन नवीन हंगाम सुरू होतो. दिवाळी हा सर्व भारतीयांचा आवडता सण आहे.

दिवाळी निबंध मराठी ३५० शब्द – Diwali Essay in Marathi 350 Words

भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जाणारा एक महान देश आहे. दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रसिद्ध सण आहे. दिवाळी हा हिंदूंचा महत्त्वाचा सण आहे. जो दरवर्षी देशभरात तसेच देशाबाहेरही साजरा केला जात आहे. हा प्रकाशाचा सण आहे, जो घरात लक्ष्मीचे आगमन आणि वाईटावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. भगवान राम, सीता आणि लक्ष्मण १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येला परतले तेव्हा हा उत्सव साजरा केला जातो. अयोध्येच्या लोकांनी तेलाचे दिवे लावून त्यांचे स्वागत केले. म्हणूनच याला ‘दीपोत्सव’ असे म्हणतात.

या दिवशी भगवान रामाने पृथ्वीला वाईट कृत्यांपासून वाचवण्यासाठी लंकेतील रावण राक्षसाचा वध केला होता. हे हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या अमायस्येला येते आणि मुख्यतः ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा इंग्रजी कॅलेंडरनुसार नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या दिवसांत येते. दिवाळीच्या दिवशी, प्रत्येकजण आनंदी दिसतो आणि दुसऱ्यांना शुभेच्छा देतात. लक्ष्मीच्या स्वागतासाठी लोक आपली घरे, कार्यालये आणि दुकानांची सफाई करतात आणि स्वच्छ करतात. ते त्यांचे घर सजवतात, दिवे लावतात आणि फटाके उडवतात.

दिवाळी सण पाच दिवसांच्या उत्सवाचा समावेश आहे जो आनंदाने साजरा केला जातो. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी म्हणून ओळखला जातो, दुसरा दिवस नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी, तिसरा दिवस मुख्य दिवाळी किंवा लक्ष्मी पूजन, चौथा दिवस गोवर्धन पूजा आणि पाचवा दिवस भाऊबीज. दिवाळी उत्सवाच्या पाच दिवसांपैकी प्रत्येकाची स्वतःची धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धा आहे. दिवाळी सण संपूर्ण देशाचा सण आहे. आमच्या भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात साजरा केला जातो.

अशा प्रकारे हा सण लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करतो. हे ऐक्याचे प्रतीक बनते. भारत हा सण हजारो वर्षांपासून साजरा करत आहे आणि आजही हा सण साजरा करत आहे जो ऐतिहासिक आणि धार्मिक दोन्ही आहे.

दिवाळी निबंध मराठी ४०० शब्द – Diwali Essay in Marathi 400 Words

दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण. हा सण दिव्यांचा आहे, प्रकाशाचा आहे म्हणून त्याला दीपावली असे नाव पडले. सुगीचा हंगाम झाल्यावर पीक घरात येते. शेतकरीराजा आनंदाने हसू लागतो. त्याच्या कष्टाचे मोल धरतीमाईने भरपूर दिले असते. अशा वेळेस दिवाळी सण येतो.

सा-या भारतात हा सण साजरा केला जातो. ह्या सणाची व्याप्ती वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशी सहा दिवसांची असते. अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील द्वादशीला म्हणजे बाराव्या दिवशी वसुबारस साजरी करतात. गायवासराचे आपल्या संस्कृतीमध्ये खूप मोठे योगदान आहे. त्या योगदानाला स्मरून ह्या दिवशी घरातील दुभती गाय आणि तिच्या वासराची पूजा करतात.

दुस-या दिवशी येते धनत्रयोदशी. ह्या दिवसापासून खरी दिवाळी सुरू झाली असे मानतात. व्यावसायिकांच्या दृष्टीने हा सण महत्वाचा असून ह्या दिवशी धनाची पूजा केली जाते. त्याशिवाय ह्या दिवशी यमदीपदानही केले जाते. त्यानंतर येणा-या नरकचतुर्दशीच्या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून ह्या दिवसाला नरकचतुर्दशी असे नाव आहे. ह्या दिवशी भल्या पहाटे उठून अभ्यंगस्नान करतात.

त्यानंतर अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात. एरवी अमावस्या अशुभ मानली जात असली तरी दिवाळीत येणारी अमावस्या अशुभ नसते. त्यानंतर येते बलिप्रतिपदा किंवा दिवाळीचा पाडवा. ह्याच दिवशी वामनाने बळीला पाताळात धाडले होते. गुजराती लोक ‘साल मुबारक’ म्हणून एकमेकांना ह्याच दिवशी शुभेच्छा देतात. तसेच पत्नी पतीला ह्याच दिवशी ओवाळते आणि पती तिला ओवाळणी घालतो.सहाव्या दिवशी असते भाऊबीज. ह्या दिवशी बहिणी भावांना ओवाळतात आणि भाऊ आपल्या बहिणींना ओवाळणी म्हणून सदिच्छाभेट देतात.

अशा त-हेने हा सण कधी पाच दिवस तर कधी सहा दिवस चालतो. ह्या काळात शाळांना सुट्टी असते. लोक घरात लाडू, चकल्या, शंकरपाळे, कडबोळी, शेव असे नानाविध पदार्थ बनवतात. नवे कपडे विकत घेतात. नातेवाईकांना भेटतात. घराभोवती रांगोळ्या काढतात, पणत्या आणि आकाशकंदील लावतात. फटाकेही फोडतात. परंतु हल्ली फटाके न फोडण्याबद्दल बराच प्रचार होतो आहे. फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण होते. तसेच त्यांच्या कारखान्यात बालमजुरांचा वापर केला जातो म्हणून फटाक्यांवर बंदी असावी.

असा हा वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिपावली.

दीपावली निबंध मराठी – Deepawali NIbandh in Marathi

दीपावलीचा अर्थ आहे दिव्यांची ओळ, भारतात प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जातो. दीपावली पर्व कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरे केले जाते. अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री दिव्यांच्या ओळी फार सुंदर दिसतात. दीपावलीच्या प्रकाशासमोर आकाशातील तारेसुद्धा निस्तेज भासतात.

असे म्हणतात की, याच दिवशी श्रीराम आपली जन्मभूमी अयोध्येला परतले होते. अयोध्यावासींनी दीपमाला पेटवून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून भारतीय लोक दीपावली दिवे लावून साजरी करतात. जैन धर्मीयासाठीही हा सण महत्त्वाचा आहे. कारण चोविसावे तिर्थंकर भगवान महावीर यांचे या दिवशी निर्वाण झाले.

दीपावली पर्व येण्यापूर्वी आणि आल्यानंतर आपल्यासोबत इतरही काही सण घेऊन येते. दीपावलीपूर्वी दोन दिवस आधी धनत्रयोदशी असते. धनत्रयोदशींच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी असते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर-नामक राक्षसाचा वध केला होता. त्यानंतर अमावास्येला दीपावली असते. या दिवशीच समुद्रमंथनातून लक्ष्मी निघाली. लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते व तिची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी ‘गोवर्धन पूजा’ असते. याच दिवशी श्रीकृष्णाने गोकुळवासीयांना अतिवृष्टीपासून वाचवून इंद्राचे गर्व हरण केले होते. पाचव्या दिवशी भाऊबीज असते. या दिवशी बहिणी आपल्या भावाला टिळा लावून दिव्याने ओवाळतात. त्याच्यासाठी मंगल कामना करतात. भाऊ बहिणींना ओवाळणी म्हणून भेटी देतात.

दीपावलीच्या आगमनापूर्वी सगळे लोक १५/२० दिवस आधीपासून तयारी करतात. घराची स्वच्छता करून घराला रंग देतात. मित्रांना शुभेच्छापत्रे पाठविली जातात. लक्ष्मीपूजनाचे विशेष आयोजन केले जाते. लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीची घरात, मंदिरात प्रतिष्ठापना केली जाते.

दिवाळीच्या दिवशी लोक पणत्यांत तेल घालून पणत्या पेटवितात, आकाशाकंदील लावतात. संपूर्ण आसमंत प्रकाशाने उजळून निघतो. सगळीकडे रंगीबेरंगी दिवे, माळा चमकत असतात. लहान मुले फटाके उडवितात. लोक आपल्या मित्र, नातेवाईकांकडे फराळाचे जिन्नस पाठवितात. व्यापारी आपली दुकाने सजवतात. हा क्षण आपापसांतल्या कटुपणाचा अंत करतो एकमेकांबद्दल, प्रेम निर्माण करतो.

दीपावली हा सण आपणास हा संदेश देते की, आपला भूतकाळ महान होता, जर आपण दिव्याच्या प्रकाशात अमावास्येची काळी रात्र पौर्णिमेच्या रात्रीत बदलू शकतो तर आपल्याच ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंध:कार पण नष्ट करू शकतो.

दिवाळी निबंध मराठी 2022 – Marathi Essay on Diwali

“दिवाळी ज्याला” दीपावली “म्हणून देखील ओळखले जाते ते भारतात किंवा जगभरातील हिंदूंच्या सर्वात शुभ सणांपैकी एक आहे. हा सण जगभरातील लोक मोठ्या उत्साहाने साजरा करतात. जरी हा हिंदू सण मानला जातो, परंतु विविध समुदायातील लोक फटाके फोडून उज्ज्वल उत्सव साजरा करतात.

हिंदूंच्या मते, दिवाळी हा सण आहे जो राक्षस रावणला हरवल्यानंतर त्याची पत्नी सीता, भाऊ लक्ष्मण आणि कट्टर भक्त हनुमान यांच्यासह भगवान राम अयोध्येत परतल्याची आठवण करतो. हा धार्मिक उत्सव वाईटावर चांगल्याचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो.

दिवाळीला अनेकदा “प्रकाशाचा सण” असे संबोधले जाते. लोक मातीचे तेलाचे दिवे लावतात आणि वेगवेगळ्या रंगांच्या आणि आकारांच्या दिव्यांनी त्यांचे घर सजवतात जे त्यांच्या प्रवेशद्वारांवर आणि कुंपणावर चमकतात ज्यामुळे एक मंत्रमुग्ध करणारे दृश्य दिसते. लहान मुलांना फटाके फोडणे आणि जसे की स्पार्कलर, रॉकेट, फ्लॉवर पॉट्स, कारंजे, पेनी फटाके इ.

या शुभ प्रसंगी, हिंदूंनी देवी लक्ष्मीची पूजा करतात कारण व्यापारी दिवाळीच्या दिवशी नवीन खाते पुस्तके उघडतात. शिवाय, लोकांचा असा विश्वास आहे की हा सुंदर उत्सव सर्वांना संपत्ती, समृद्धी आणि यश आणतो. लोक स्वतःसाठी नवीन कपडे देखील खरेदी करतात आणि सणादरम्यान त्यांचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईक यांच्यासोबत भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्यास उत्सुक असतात.”

आम्हाला आशा आहे की दिवाळी या विषयावर निबंध लिहू इच्छिणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. वर दिलेल्या निबंधातील शुभ दिवाळी सणाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी आम्ही आमच्या शेवटपासून एक माफक प्रयत्न केला आहे. मुले दिवाळीच्या या नमुना निबंधातून काही कल्पना निवडू शकतात आणि काही ओळी तयार करू शकतात आणि वाक्ये कशी बनवायची आणि एकाच वेळी त्यांचे मराठी लेखन कौशल्य कसे वाढवायचे ते शिकू शकतात.

दिवाळी निबंध मराठी – Diwali Nibandh in Marathi Short

आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक वद्य द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते. या काळात पाचही दिवस घरापुढे पणत्या लावून दिव्यांची आरास करतात. म्हणूनच त्या सणाला दिवाळी किंवा दीपावली असे म्हणतात. उंच ठिकाणी आकाशकंदीलही लावतात. दारापुढे रांगोळी काढतात. फुलांचे हार दाराला लावतात.

दिवाळीसाठी लोक नवे कपडे शिवतात. दागदागिने करतात. लाडू, करंज्या चकल्या वगैरे फराळाचे जिन्नस बनवतात. फळे मेवामिठाई आणतात. फटाके फुलबाज्या यांचा तर धुमधडाका चालू असतो.

दिवाळीत लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा (पाडवा) आणि भाऊबीज हे दिवस महत्त्वाचे असतात. भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. ओवाळणी म्हणून भाऊ बहिणीला साडी किंवा काही भेट देतो. दिवाळी हा सण श्रीमंतापासून तर गरिबापर्यंत सर्वांचा आवडता सण आहे. सर्वजण हा सण साजरा करतात.

दिवाळी निबंध मराठी – Diwali Essay in Marathi for Class 1, 2, 3

दिवाळी म्हणज सर्व सणांची राणी. दिवाळीत दिव्यांची सगळीकडे आरास केलेली असते. घरासमोर सगळीकडे दिवेच दिवे, मोठमोठाले आकाशकंदिल असतात.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. दसऱ्यापासूनच दिवाळीची तयारी सुरु होते. बाजारात खूप गर्दी असते. दिवाळीच्या दिवसात घरांपुढे सुंदर रांगोळी काढली जाते. लहान मुले किल्ले करतात. काही गावात तर किल्ल्यांच्या स्पर्धा व प्रदर्शनेही असतात. दिवाळी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. तो संपूर्ण भारतभर मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. दिवाळी पाच दिवसांचा सण असतो. यामध्ये नरकचर्तुदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीज हे सण येतात.

दिवाळीला सर्वांना नवीन, नवीन कपडे मिळतात. तसेच घरांना, दुकानांना रंगही दिले जातात. घराघरात चकली, कडबोळी, करंजी, लाडू असे विविध पदार्थ बनविले जातात.

एकमेकांना शुभेच्छा पत्रेही पाठविली जातात. लहान मुले फटाक्यांची आतषबाजी करण्यात तल्लीन होतात. सर्वजण दिवाळी आनंदाने साजरी करतात.

Diwali Essay in Marathi

दिवाळी दिव्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. यामुळे दिवाळीच्या काळात संपूर्ण देशात चमकणारे दिवे असतात. दिवाळीवरील या निबंधात आपल्याला दिवाळीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व दिसेल.

दिवाळी निबंध मराठी, Diwali Essay in Marathi

दिवाळीचे धार्मिक महत्त्व

या उत्सवाचे धार्मिक महत्त्व भिन्न आहे. हे भारतात वेगवेगळ्या प्रदेशात बदलते. दिवाळीबरोबर बरीच देवता, संस्कृती आणि परंपरेची जोड आहे. या फरकांचे कारण कदाचित स्थानिक कापणीचे सण. म्हणून, या पॅन-हिंदू सणांमध्ये एका पॅन-हिंदु उत्सवात उत्सर्जन होते.

रामायणानुसार दिवाळी हा रामाच्या परतीचा दिवस आहे. या दिवशी भगवान राम पत्नी सीतेसमवेत अयोध्येत परतले. रामाने राक्षस राजा रावणाला पराभूत केल्यानंतर ही परत आली. शिवाय, रामाचा भाऊ लक्ष्मण आणि हनुमान देखील अयोध्येत विजयी झाले.

दिवाळीच्या कारणास्तव आणखी एक लोकप्रिय परंपरा आहे. येथे भगवान विष्णूंनी कृष्णाचा अवतार म्हणून नरकासुराचा वध केला. नरकासुरा नक्कीच राक्षस होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विजयामुळे 16000 बंदिवान मुलींची सुटका झाली.

शिवाय, हा विजय वाइटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. हे भगवान श्रीकृष्ण चांगले असून नरकासुराचे वाईट आहे.

दिवाळीला देवी लक्ष्मी असणं ही अनेक हिंदूंची श्रद्धा आहे. लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी आहे. ती देखील संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे.

एका आख्यायिकेनुसार दिवाळी लक्ष्मी लग्नाची रात्र आहे. या रात्री तिने विष्णूची निवड करुन लग्न केले. पूर्व भारत हिंदू दिवाळी देवी दुर्गा किंवा कालीशी जोडतात. काही हिंदूंचे मत आहे की दिवाळी नवीन वर्षाची सुरुवात होईल.

दिवाळीचे आध्यात्मिक महत्व

सर्व प्रथम, बरेच लोक दिवाळीच्या वेळी लोकांना क्षमा करण्याचा प्रयत्न करतात. हा नक्कीच एक प्रसंग आहे जिथे लोक विवाद विसरतात. म्हणून दिवाळीच्या काळात मैत्री आणि नाती मजबूत होतात. लोक त्यांच्या मनापासून द्वेषाच्या सर्व भावना काढून टाकतात.

हा सुंदर उत्सव समृद्धी आणतो. दिवाळीच्या दिवशी हिंदू व्यापारी नवीन अकाउंट बुक उघडतात. शिवाय, ते यश आणि समृद्धीसाठी देखील प्रार्थना करतात. लोक स्वत: साठी आणि इतरांसाठी नवीन कपडेही खरेदी करतात.

हा हलका सण लोकांना शांती देतो. हे मनाने शांतीचा प्रकाश आणते. दिवाळी लोकांमध्ये नक्कीच शांतता आणते. आनंद आणि आनंद सामायिक करणे म्हणजे दिवाळीचा आणखी एक आध्यात्मिक लाभ. या दिव्याच्या उत्सवात लोक एकमेकांच्या घरी भेट देतात. ते आनंदी संप्रेषण करतात, चांगले जेवण करतात आणि फटाक्यांचा आनंद घेतात.

शेवटी, थोडक्यात म्हणजे दिवाळी हा भारतातील एक आनंददायक अवसर आहे. या भव्य उत्सवाच्या रमणीय योगदानाची आपण कल्पनाही करू शकत नाही. हा जगातील सर्वात मोठा उत्सव आहे.

  • सावित्रीबाई फुले निबंध मराठी
  • माझे आजोबा निबंध मराठी
  • माझी आजी निबंध मराठी 
  • माझे बा बा निबंध मराठी
  • मी पाहिलेला अपघात निबंध
  • माझी शाळा मराठी निबंध
  • माझा आवडता खेळ निबंध
  • माझा जिवलग मित्र मराठी निबंध 
  • माझे कुटुंब निबंध मराठी
  • शिक्षक दिन निबंध मराठी 
  • माझी शाळा निबंध मराठी लेखन
  • माझी आई निबंध मराठी
  • माझी शाळा निबंध 10 ओळी
  • मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका निबंध 10 ओळी 

दिवाळी वर सामान्य प्रश्न FAQ

Q.1 दिवाळीच्या धार्मिक महत्त्वात फरक का आहे.

A.1 दिवाळीच्या धार्मिक महत्त्वात नक्कीच फरक आहेत. हे स्थानिक कापणी सणांमुळे आहे. हे सण नक्कीच एकत्र येऊन एक पॅन-हिंदू उत्सव तयार करतात.

Q.2 दिवाळीने समृद्धी कशी मिळते ते सांगा?

A.2 दिवाळी दिवाळीने समृद्धी आणली कारण हिंदू व्यापारी दिवाळीत नवीन खाती पुस्तके उघडतात. शिवाय, ते यश आणि समृद्धीसाठी देखील प्रार्थना करतात.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | maza avadta mahina shravan nibandh, माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | maza avadta khel badminton marathi nibandh, माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास, भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | bhartiy samajat striyanche sthan marathi nibandh, मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | marathi shahityatil suvarn kan nibandh, मना घडवी संस्कार मराठी निबंध, “मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”, भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | bhartatil vansanpatti essay marathi, भारतीय लोकशाही मराठी निबंध | bhartiya lokshahi marathi nibandh, leave a reply cancel reply.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

GETMARATHI

diwali essay in marathi 10 lines!! दिवाळी निबंधात या साध्या सोप्या ओळी!!

   दिवाळी हा सण हिंदूंचा असला तरी सर्व हा दिवस अगदी आनंदाने केला जातो.दिवाळी निमित्त आपण (diwali essay in marathi 10 lines) शाळेत ठेवलेलं निबंध त्यासाठी काही महत्वाच्या लाईन्स आहेत. दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण आहे.

दिवाळी हा एक हिंदू सण आहे जो भारत, नेपाळ, युनायटेड, कॅनडा इंडोनेशिया अशा काही देशात दिवाळी हा सण अगदी आनंदाने  साजरा केला जातो.

अंधारावर प्रकाशाचा विजय वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो.

दिवाळी शरद ऋतूतील विषुववृत्तीला कार्तिक महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते, जी ऑक्टोबर/नोव्हेंबरमध्ये येते.

  शाळेतील मुलांसाठी 10 ओळी निबंध(diwali essay in marathi 10 lines)

  !माझ्या तर्फे दिवाळीच्या सर्वांना भरभरून हार्दिक शुभेच्छा!

  • दिव्यांचा सण 2022 

दिवाळी 2022हा एक दिव्यांचा सण आहे आणि आनंदाचा देखील लहान मुले तर या दिवसाची वाट बघत राहिलेले असतात 

Diwali हा दिव्यांचा सण आहे आणि तो हिंदू, जैन आणि शीख यांनी साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे.

  • दिवाळी - kalnirnay

यावर्षी, दिवाळी 24 ऑक्टोबर 2022 (सोमवार) रोजी धनत्रयोदशीनंतर 22 ऑक्टोबर (शनिवार) आणि छोटी दिवाळी 23 ऑक्टोबर (रविवार) रोजी साजरी केली जात आहे.24 (सोमवार)ऑक्टोबर छोटी दिवाळी आणि मोठी दिवाळी.

25 ( मंगळवार) ऑक्टोबर गोवर्धन पुजा आणि  26 ऑक्टोबर बुधवार  या दिवशी भाऊबीज अशीच दिवाळी ही पाच दिवसाची असते.

  •  दिवे ,मेणबत्त्या

या दिवशी लोक आपल्या घरात मेणबत्त्या, दिवे लावतात.  सर्वजण दिवाळी  या सणाला मेणबत्त्या तर लावतात परंतु ते का लावतात त्यामुळे ,लावण्याची कारण काय आहे हे माहीत असणे गरजेचे आहे.

जर आपण एखादा  सण-उत्सव करत असाल तर त्याची पूर्ण माहिती असणे अत्यावश्यक असते.

सर्व लोक दिवाळी तर करतात परंतु ती दुसरे लोक शेजारील लोक व्यक्ती करतात म्हणून ते करतात परंतु त्यांना या सणांचे महत्त्व किंमत माहिती नसते.

प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास पूर्ण करून आयोध्या नगरीत पोहोचले होते त्यामुळेसुद्धा एक दिवे लावण्याची प्रथा पडली. 

 दिवाळी या सणाला लावण्या मागचे मोठी कारण म्हणजे दिवा ही एक सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे प्रत्येक घरी हा दिवा लावल्यानंतर नकारात्मक ऊर्जा नष्ट  होते आणि  सकारात्मक ऊर्जेचा प्रकाश पूर्ण आपल्या जवळच्या परिसरात पसरतो आणि नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे नष्ट होते त्यामुळेसुद्धा दिवाळी हा सण आला की लोक नवीन वर्ष सुद्धा म्हणतात.

  • प्रभू राम  

भारतामधील सर्वात मोठ्या सणांपैकी हा एक सण म्हणजेच दिवाळी दिवाळी हा सण भगवान रामाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते ते चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत  परतले होते.

  •   फुलझाड

दिवाळीच्या प्रसंगी, अनेक कुटुंबे संध्याकाळच्या अंधारात प्रकाश आणण्यासाठी फुलझारी (चमकदार) वापरतात. फुलझरी, सर्वात लोकप्रिय, चमकदार आकार आणि सोनेरी, लाल, चांदी आणि इतर अनेक रंगांमध्ये येतो.

दिवाळी 2022- रांगोळी

दरवर्षी, लोक वेगवेगळ्या रंगीबेरंगी रांगोळी डिझाइन करून घरे ऑफिस कार्यालय कामाची जागा सजवतात. 

या दिवशी काही लोक रंगीबिरंगी फुलांच्या पाकळ्याचा वापर करून उत्कृष्ट अशी रांगोळी देखील काढतात. 

कपडे घालण्याची परंपरा आणि दागिने 

दिवाळीच्या पूजेसाठी नवीन कपडे आणि दागिने घालण्याचीही परंपरा आहे.

दिवाळी म्हटली की सर्वांना कपडे  नवीन  दागिने घेणे असा विचार करत बसलेली असतात. 

लक्ष्मीपूजन दिवशी नवनवीन दागिने नवीन नवीन वस्तू खरेदीत सुद्धा केल्या जातात असे मानले जाते की नाही लक्ष्मीपूजन दिवशी नवनवीन वस्तू खरेदी करावे. 

  • धनत्रयोदशी (Dhanteras or Dhan Trayodashi)

22 ऑक्टोबर हा दिवस धनत्रयोदशी हा दिवस देवांनी आणि असुरांनी केलेल्या समुद्र-मंथनातून आलेले देव धन्वंतरी यांचा जन्म झाला होता.

22 ऑक्टोबर चा हा दिवस लोक वैद्य देव धनवंती यांची आणि लक्ष्मी देवीची पूजा देखील करतात. 

धनत्रयोदशी, पाच दिवसांच्या दिव्यांच्या उत्सवाचा पहिला दिवस, नवीन धातूच्या वस्तू, विशेषतः सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी आणि आणण्यासाठी चांगला दिवस मानला जातो.

(diwali essay in marathi 10 lines)पर्यावरणपूरक दिवाळीवर लहान आणि सोपे मराठी निबंध टिपा आणि कल्पना

दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे लोक दिवाळी आल्यामुळे सफाईमध्ये व्यस्त आहेत. 

 लक्ष्मीपूजन दिवशीच्या लक्ष्मीमातेच्या स्वागतासाठी  सर्वजण आपली घरे फुलांनी आणि रांगोळ्यांनी सजवत आहेत.

अनेकजण दिवाळीचा संबंध फटाके फोडण्याशी जोडतात, तर त्यामुळे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होते.

दिल्लीत सरकारने दिवाळीच्या दिवशी सर्व प्रकारच्या  ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण करणाऱ्या सर्व फटाक्यांवर बंदी घातली आहे, तर पंजाबने 24 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते रात्री 10 या दोन तासाची मुभा दिली आहे.

24 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमध्ये कालीमातेच्या पूजेदरम्यान काही फटाक्यांना परवानगी आहे. 

हरियाणाने काही फटाक्यांवर बंदी घातलेली आहे.

विद्यार्थ्यांना प्रदूषण विरहित दिवाळी साजरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांना 'फटाक्यांना नाही म्हणा' आणि 'पर्यावरणपूरक प्रदूषण विरहित दिवाळी दिवाळी कशी साजरी  करता येईल' यासारख्यासंमत संबंधित विषयांवर दिवाळी भाषण आणि निबंध लिहिण्यास सांगितले जाते सांगायला पाहिजे.

 ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे काय परिणाम होतात हे सुद्धा त्या विद्यार्थ्यांना मुलांना समजावून सांगितले पाहिजे.

विद्यार्थ्यांना कोणती गोष्ट केव्हा कळते आणि कशी समजते ते त्यांच्या शिक्षकांनाच माहीत असते आणि आई-वडिलांना सुद्धा होईल असते त्यामुळे प्रदूषण विरहीत दिवाळी करण्याचे काम हे आई-वडील आणि शिक्षकांवर सुद्धा  अवलंबून असते.

शिक्षक जर पूर्णपणे विद्यार्थ्यांना दिवाळी  दिवाळी फटाके या पासून होणारे दुष्परिणाम आणि त्यापासून होणारे नवनवीन विकार आणि त्यापासून मृत्यू पावत असलेल्या व्यक्ती अशा सर्व गोष्टींची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या मुलांच्या पद्धतीने सांगितल्यावर हे नक्की यशस्वी होईल.

     

दिवाळी निबंध  टिपा आणि कल्पना ( diwali essay in marathi 10 lines for class 5) :.

Diwali 2022 निबंध टिप्स

दिवाळीचे भाषण लहान ठेवावे कारण विद्यार्थ्यांना मोठे निबंध /भाषण शिकता समजत समजत नाही किंवा ते समजून घेण्यास त्यांची मानसिकtaa नसते त्यामुळे भाषण हे लहान आणि लहान मुलांना वाचण्याजोगे  करावे. 

दिवाळीचे भाषण विद्यार्थ्यांना आठवणार असे अवघड शब्दांचे भरू नका त्यांना समजेल अशी भाषा त्या भाषणात  वापरा म्हणजे त्यांना ते समजून बोलणे एकदम सोपे होईल आणि ते न अडखळता बोलू शकतील.

निबंध लिहण्याचा सराव करावा भाषणाचा सराव करावा.

दिवाळी, दिव्यांचा सण, वाईटावर चांगल्याचा विजय.

अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी केली जाते. हे लक्ष्मण आणि सीतेसह प्रभू राम अयोध्येला परत आली.

त्यांच्या परत याचा आनंद साजरा करण्यासाठी, अयोध्येतील स्वतःची लोकांनी स्वच्छ केली आणि फुलांनी सजवलेले होते.त्यांचे परतीचे स्वागत करण्यासाठी दिवे लावले. तेव्हापासून हा दिवसदिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला.

दिवाळी या शब्दाचा उगम संस्कृत शब्द खोल (दीप) आणि वाली (पंक्ती) पासून झाला आहे.

याचा शाब्दिक अर्थ कसा आहे"दिव्यांची पंक्ती".

(Diwali 2022 marathi) हा सण पाच दिवसांचा उत्सव आहे जो सुरू धनत्रयोदशीपासून होतो आणि भाऊबीज पर्यंत चालतो.

दिवाळी साजरी करण्यासाठी लोक आपली घरे दिवे, रांगोळ्या आणि दिव्यांनी सजवतात.

आपण फटाक्यांचा वापर नाही केला पाहिजे आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रदूषणविरहित प्रदूषण दिवाळी साजरी केली पाहिजे. 

पर्यावरणपूरक दिवाळी हवा आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यास मदत करते. 

फटाक्याचा मोठा आवाज झाल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोक आणि कुत्रे आणि इतर प्राण्यांना त्रासदायक देखील ठरू शकतो.

10 Reasons Why Celebrate Diwali (diwali essay in marathi 10 linesदिवाळी का साजरी करतो याची 10 कारणे)

दिवाळी हा हिंदू सण मानला जात असला तरी देशभरात विविध समुदायांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो.

दिवाळी हा प्रकाशाचा सण का साजरा करतो? 

Diwali 2022 हा संपूर्ण भारतात देशात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा (दिवे)प्रकाशमय सण म्हणून ओळखला जातो.

दिवाळी किंवा दीपावली कार्तिक महिन्यात साजरी केली जाते आणि हा सण साधारणपणे पाच दिवस चालतो, धनत्रयोदशीपासून सुरू होतो. त्यानंतर नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी), लक्ष्मी पूजन (मोठी दिवाळी), गोवर्धन पूजा आणि भाई दूज.

प्रत्येक भागात दिवाळी ही अगदी हर्ष उल्हासाने साजरी केली जाते प्रत्येकाच्या घरात कोपऱ्यात मातीचे दिवे लावून साजरी केली जाते. 

दिवाळी हा हिंदू सण मानला जात असला तरीही देशभरात विविध समुदायांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. 

दिवाळी कुठेही साजरी करीत असले तरी दीपावलीचा आध्यात्मिक संदेश एकच राहतो जो ‘अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा’ आणि वाईटावर चांगल्याचा आहे विजय होत असतो.

 1.भगवान श्रीकृष्णाने नरकासुर वध 

भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला.

कारण तो प्राग्ज्योतिषपुराचा दुष्ट राजा होता आणि त्याने 16,000 मुलींना कैदेत ठेवले होते त्यामुळे त्याचा वध केला होता. 

भारताच्या उत्तरेकडील भागात, दक्षिणी तमिळ आणि आसाम, नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी) हा दिवस म्हणून ओळखला जातो ज्या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला.

 2.प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण अयोध्येला परतणे

दिवाळी म्हणजे वाईटावर चांगल्या गोष्टींचा विजय आणि प्रभू श्रीराम अयोध्येत परतल्यानंतर झालेला उत्सव. 

हिंदू रामायणानुसार, भगवान राम, त्यांची पत्नी सीता त्यांचा भाऊ लक्ष्मण हे राजा रावणाचा पराभव केल्यानंतर प्रभू श्रीराम 14 वर्षांनी अयोध्येला परतले होते.

 3.देवी लक्ष्मीचा पुनर्जन्म

देवांनी आणि असुरांनी केलेल्या समुद्र मंथनमध्ये जन्म झालेल्या लक्ष्मीच्या पुनर्जन्माला अनुसरून दिवाळी साजरी केली जाते. 

देव आणि दानवांनी केलेल्या दुधाच्या वैश्विक समुद्राचे मंथन होते.

(कथेनुसार)प्रचलित मान्यतेनुसार, लक्ष्मीच्या जन्मानंतर त्रिमूर्ती यांनी ठरवले की  विवाह करण्याचा अधिकार लक्ष्मी देवीचा आहे त्यामुळे दिवाळीच्या रात्री लक्ष्मीने विष्णूला आपला पती म्हणून निवडले आणि त्याच्याशी लग्न केले.

 4.पांडवांचे हस्तिनापूरला परतणे

मामा शकूनी यांनी ठरवलेली पैज हरण्यात फसलेल्या पाच पांडव बंधूंना कौरव बंधूंनी 12 वर्षांसाठी पांडवांना हद्दपार केले होते.

महाकाव्य महाभारतानुसार, कार्तिक अमावस्येला पांडव हस्तिनापुर राज्यात परतले होते.

 5.बंदी चोर दिवस

शीख धर्मात दिवाळी हा सण ऐतिहासिक घटना म्हणून साजरा केला जातो. सहावे शीख गुरू, गुरु हरगोबिंद, इतर 52 हिंदू राजांसह, मुघल सम्राट जहांगीरच्या कैदेतून दिवाळीच्या मुहूर्तावर मुक्त झाले.

 6.कापणीचा हंगाम 

एक लोकप्रिय समज अशी आहे की, जो हिवाळ्याच्या हंगामापूर्वी वर्षातील शेवटचा हंगाम दर्शवितो.

दिवाळी हा सण लोकप्रिय आहे त्यामुळे लोकांची अशी समजूत आहे की दिवाळी हा सण म्हणजे वर्षातील शेवटचा हंगामा होय.

शेवटचा हंगाम म्हणजे  हिवाळ्याच्या हंगामा कापणीचा  शेवट म्हणजे थंडी पूर्वी कापणी पूर्ण होते.

 7. काली पूजा

नरक चतुर्थी दिवशी काली पूजा केली जाते. 

diwali essay in marathi 10 lines

शक्ती धर्माच्या कलिकुल पंथ नुसार, कमलात्मिकाच्या अवताराचा दिवस महाकाली च्या अवताराचा दिवस,

देवी महाकालीचे शेवटचे अवतार देखील कमलात्मिका काली जयंती म्हणून साजरी केली जाते आणि ती दिवाळीच्या दिवशी येते. 

या दिवशी  काली  मातेची पूजा केल्यानंतर शत्रूवर विजय मिळवण्याचा आशीर्वाद मिळतो

काली पूजा ओडिशा,पश्चिम बंगाल,चितगाव, मिथिला, सिल्हेट आणि महाराष्ट्रातील टिटवाळा या प्रदेशात साजरी केली जाते.

 8.महावीर निर्वाण दिवस

जैन धर्मातील भगवान महावीरांचे निर्वाण बहात्तर (वयात)वर्षानंतर झाले होते. 

भगवान महावीरांच्या आत्म्याच्या निर्वाणाच्या वर्धापन दिनानिमित्त दिवाळी हा सण साजरा केला जातो. 

वैश्विक युगातील चोविसावे व शेवटचे जैन तीर्थंकर होते. 

महान भगवान महावीरांनी कार्तिक महिन्याच्या चतुर्दशीला मोक्ष (मुक्ती) प्राप्त केली.

 9.दिवाळी नवीन वर्ष म्हणून साजरी केली जाते

भारतातील उत्तर हिंदू समुदायांमध्ये आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये दिवाळी हा सण देखील नवीन वर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक मानली जाते.

नवीन वर्ष का? तर दिवाळीनंतर वाईट गोष्टींचा (नकारात्मक गोष्टी सकारात्मक) नाश होतो चांगल्या गोष्टीची सुरुवात होते त्यामुळे दिवाळीपासून नववर्ष सुद्धा म्हटले जाते.

 10.विष्णूने देवी लक्ष्मीची सुटका केली

 भगवान विष्णूने लक्ष्मीची देवीची  दैत्यराज बळीच्या तुरुंगातून मुक्त केले होते.

 या दिवशी भगवान विष्णूच्या आदेशानुसार असुरांचा राजा बळी भूतकाळावर राज्य करण्यासाठी हद्दपार करण्यात आले होते.

दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण सर्वांनी आनंददायी जावो अशा आमच्या परिवाराच्या वतीने तुम्हाला सर्वांना भरभरून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

दिवाळी निमित्त निबंध (diwali essay in marathi 10 lines) लिहण्यासाठी आपण या दिलेल्या गोष्टीचा लाईन्स वापर करून  तुम्ही  निबंध उत्कृष्ट लिहू शकता .

You might like

Post a comment, contact form.

Marathi Nibandhs

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध | maza avadta san diwali essay in marathi.

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध , Maza Avadta San Essay In Marathi

माझ्या आवडता सण दिवाळी मराठी निबंध | Maza Avadta San Essay In Marathi

आपल्या देशात खूप सण साजरे केले जातात आणि त्या मधे माझा सर्वात आवडता सण आहे दिवाळी. नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध , maza avadta san essay in marathi बघणार आहोत. , माझ्या आवडता सण दिवाळी, हे   निबंध   सुधा   जरूर   वाचवे :-, टीप : वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते essay on diwali in marathi maza avadta san my favorite festival diwali in marathi.

' class=

Related Post

दिवाळी मराठी निबंध

Diwali Nibandh Marathi: दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आल्याच्या आठवणी म्हणून साजरा केला जातो. राम हा एक अतिशय लोकप्रिय हिंदू देवता आहे जो आपल्या सत्यतेबद्दल आणि शुद्धतेसाठी आदरणीय आहे.

Diwali Rangoli Design

विद्यार्थ्यांना शाळेत असताना उत्सव सण याविषयी निबंध लेखन असते. दिवाळी हा मराठी संस्कृती मिळेल सर्वात मोठा आनंदाचा रोषणाईचा उत्सवाचा उत्सव आहे याविषयी आपण निबंध पाहणार आहोत सदर निबंध इयत्ता पहिली दुसरी चौथी ते सहावी सातवी दहावीपर्यंत कुणालाही उपयुक्त आहे. सदर निबंध तुमच्या लेखनाला निश्चितच सहाय्यक ठरेल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया

Diwali Nibandh Marathi, Nibandh Marathi Madhe, Diwali Essay In Marathi, Essay On Diwali In Marathi, माझा आवडता सण – दिवाळी निबंध, diwali nibandh in marathi, Marathi Essay on Diwali, Marathi Nibandh Diwali.

दिवाळी वर मराठी निबंध | Diwali Nibandh Marathi

10 lines on diwali in marathi.

  • दिव्यांचा सण म्हणजे दीपावली.
  • दिवाळी हा सण सर्वांनाच आनंद देणारा असतो.
  • दिवाळीच्या दिवसात घरापुढे सुंदर रांगोळ्या काढतात.
  • अशा या दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप मौजमजा करायला मिळते.
  • अश्विन वदय त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते.
  • दिवाळीच्या पाच दिवसात घरापुढे कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास करतात.
  • फटाक्यांबरोबर मुलांना दिवाळीत नवीन नवीन व छान कपडे मिळतात.
  • दिवाळीतील एक दिवस लक्ष्मीपूजन असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.
  • सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. म्हणून दिवाळी हा सण मला खूप आवडतो.
  • सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

diwali essay in marathi 10 lines

मराठी दिवाळी लहान निबंध (150 Words)

Short Essay On Diwali In Marathi: दिवाळी येण्यापूर्वी त्याच्या स्वागताची तयारी सर्वजण करू लागतात आणि एकमेकांना सांगतात, ” आली, दिवाळी आली!” दिवाळी हा भारतात सर्वत्र साजरा केला जाणार असं नाही. दिवाळीच्या दिवसात असं नाही. हा जणू सणांचा एक महरचा आहे. ! माणसाला मनातील सर्व उदात्त भावना यात व्यक्त होतात. अश्विन महिन्यात द्वादशीला” वसू भारत” सवत्स म्हणजे वासरासह गायीची पूजा केली जाते.

आपल्याला दूध देणाऱ्या गोमातेची ही पूजा असते. धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते: तर लक्ष्मीपूजनाला व्यापारी लोक आपल्या चोपड्या ची पूजा करतात. धन मिळाले तर माणसाने गर्व करू नये, ही शिकवण मिळते. नरकचतुर्थीला नरकासुराचा म्हणजे वाईट वृत्तीचा सहार करायचा असतो; तर बलिप्रतिपदेला दानशूर बळीचा गौरव गुणाची गौरव करायची असते. भाऊबीज ही बहिण भावाच्या निर्मळ प्रेमाचे प्रतीक आहे.

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. पण त्या आकाश कंदील आणि रोषणाई करून तिचे स्वागत करायचे. नवे कपडे घालायचे. आप्त, मित्र फराळ करायचा रात्री खूप फटाके उडवायचे.रोजच्या कटकटी विसरून, आनंदाने सर्वांनी एकत्र येऊन मजा करायची, हा संदेश दिवाळी येते.; असण्याचा नाही म्हणून इतर धर्मांनी या सणासाठी आमंत्रित केले जाते

दिवाळी निबंध मराठी मध्ये (200 Words)

अशा या दिवाळी सणाच्या निमित्ताने खूप मौजमजा करायला मिळते. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. म्हणून दिवाळी हा सण मला खूप आवडतो.

सण हा आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे. आपल्या देशात अनेक प्रकारचे सण साजरे होतात. दिवाळी, दसरा, होळी, नाताळ, पोंगल, ओणम,रक्षाबंधन, ईद,पोळा यासारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

या सर्व सणापैकी दिवाळी हा माझा आवडता सण आहे. अश्विन वदय त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळी असते. दिवाळी हा सण सर्वांनाच आनंद देणारा असतो. दिवाळीच्या पाच दिवसात घरापुढे कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास करतात. दिव्यांचा सण म्हणजे दीपावली.

दीप आपल्याला प्रकाश देतो. त्याप्रमाणे दिवाळीच्या निमित्ताने ‘अंध:कार दूर करा व आपलं मन चांगल्या भावनेने उजळून टाका’, असा दीपकचा अर्थ आहे. दिवाळीच्या सणातून आपण ऐक्य भावना शिकतो.

दिवाळीच्या दिवसात घरापुढे सुंदर रांगोळ्या काढतात. मुले घरासमोर मातीचे छोटे-छोटे किल्ले बांधतात. फुलबाजा, फटाके, भुईचक्र, अनार असे फटाके लावून मुलं दिवाळीच्या दिवसात आनंदात असतात. फटाक्यांबरोबर मुलांना दिवाळीत नवीन नवीन व छान कपडे मिळतात. घरात लाडू, करंज्या, चकल्या वगैरे फराळाचा घमघमाट सुटलेला असतो. मिठाईचे डबे घरात येतात. लहान मुलांची तर चंगळ होते.

शाळेला सुट्टी असल्यामुळे परीक्षेची चिंता नसते. दिवाळीतील एक दिवस लक्ष्मीपूजन असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.

भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळते. दूर रहात असलेला भाऊ या दिवशी बहिणीकडे येतो. काही ठिकाणी भाऊबीजेला चंद्राला ओवाळण्याची प्रथा आहे. सर्वच जण दिवाळी हा सण एकत्र येऊन आनंदाने साजरा करतात.

Read Also: माझी आई मराठी निबंध

दिवाळी विषयी निबंध (300 Words)

भारतात सर्व सण खूप उत्साहात आणि आनंदात साजरे केले जातात. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळी! दिवाळीला “दिपावली” असे देखील म्हणतात. हा सण म्हणजे दिव्यांची रोषणाई असते. संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळवून टाकायचा असतो.

इंग्रजी महिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळी हा सण असतो. तब्बल चार दिवस या सणाचे महत्त्व असते. शेतीची सर्व कामे संपून धान्य घरी आणले की हा सण साजरा केला जातो. त्याअगोदर घराची आणि परिसराची स्वच्छता केली जाते. आश्विन महिन्याचा शेवट आणि कार्तिक महिन्याची सुरुवात, असे या सणाचे दिवस असतात.

दिवाळी अगोदर छान छान तिखट-गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा असे मुख्य पदार्थ तर बनवले जातातच. याशिवाय बेसन आणि रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चिक्की असे पदार्थही आता बनवले जातात. घरातील सर्वांना नवीन कपडे घेण्याचा हा मुहूर्त असतो.

दिवाळीअगोदर सर्व खाद्य पदार्थांची आणि वस्तूंची खरेदी केली जाते. आकाशकंदील, रांगोळी, फटाके, सुगंधित उटणे, साबण, पणत्या इत्यादी वस्तूंची खरेदी केली जाते. दिवाळीअगोदर एक दिवस आकाश कंदील आणि विजेच्या दिव्यांची माळ घराभोवती सजवली जाते. सर्वजण मिळून खाद्यपदार्थ बनवतात.

लहान मुलांना दिवाळी म्हणजे एक आनंदाचे पर्व असते. पहिल्या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे आणि नाश्त्याला गोड-तिखट असा फराळ करणे हे सर्वांनाच आवडते.

घरातील मुली आणि स्त्रिया घरापुढे छानशी रांगोळी काढतात. धनत्रयोदशीला संपत्तीची आणि धनाची पूजा करतात. नरक चतुर्थीला सकाळी लवकर उठून अंघोळ केली जाते. सुगंधित उटणे आणि तेलाने स्वच्छ अंघोळ केली जाते. त्यानंतर फराळ केला जातो. त्यानंतरचा दिवस म्हणजे दीपावली पाडवा किंवा बलिप्रतिपदा! या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींचे आणि वस्तूंचे औक्षण केले जाते.

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे भाऊबीज! बहीण भावाला ओवाळते. भावाने नंतर काहीतरी भेट वस्तू देण्याची प्रथा आहे. भाऊ आणि बहीण यांच्या नात्यातील गोडवा त्याद्वारे स्पष्ट होतो. असा हा दिवाळीचा सण खूप आनंद, रोषणाई, सुख आणि समाधान घेऊन येत असतो. त्यामुळे माझा दिवाळी हा आवडता सण आहे.

Read Also: डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी निबंध

दिवाळी निबंध मराठी (600 Words)

भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि महत्वाचा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात. असे म्हटले जाते कि “दिवाळी” रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे.

आपल्या देशात दिवाळी हिंदू महिना आश्विन च्या शेवटी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये मोठ्या उल्हासात साजरा करतो. आजकाल दिवाळी मोठ्या रंगीत माध्यमांनी साजरी होते. परंतु दिवाळीचे ऐतिहासिक महत्वास लोक आजही जाणतात.

दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली. ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते.

सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.

दिवाळीत संपूर्ण घराला सजवले जाते. घरी बनविलेल्या मिठायांचे आदान प्रदान केले जाते. भारतात सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली.

तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे. अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते.

घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात.

पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.

दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो.

अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.

असे म्हटले जाते कि शाही आदेशानुसारच श्रीराम व माता सीता यांचे अयोद्धया पासून ते मिथीला पर्यंत संपूर्ण प्रदेश दिव्यांच्या रोषनाई ने जगमगुण गेला होता. अशा प्रकारे त्या अंधाऱ्या रात्रीला दिव्यांच्या प्रकाशाने उजाळून टाकले होते.

श्रीरामांचे स्वागत यासाठीही अधिक महत्वाचे होते कारण श्रीराम १४ वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात वापस आले होते, त्यावेळी त्यांनी महामायावी दानव रावण याचा वधहि केला यामुळे हे स्वागत फार उत्साहाचे होते.

दिवाळीला आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात. यामूळे मला दिवाळी हा सण खूप आवडतो.

  • दीवाली पर संस्कृत निबंध
  • दिवाली पर निबंध
  • दिवाली पर बेहतरीन शायरी
  • दि‍वाली पर कविताएं

Rahul Singh Tanwar

Related Posts

Leave a comment जवाब रद्द करें.

Nibandh

दिवाळी निबंध मराठी - Diwali Essay in Marathi - Diwali Information in Marathi - Diwali Nibandh in Marathi

ADVERTISEMENT

दिवाळी (Diwali)

दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.

ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.

अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.

Nibandh Category

Creator Marathi

Best Place for Marathi Content

दिवाळी मराठी निबंध – Diwali essay in marathi

Diwali essay in marathi

Diwali essay in marathi :- आजच्या लेखामध्ये आपण भारतीय सण दिवाळी बद्दल मराठी निबंध (Diwali essay in marathi) पाहणार आहोत. दिवाळी हा भारतातील एक अत्यंत लोकप्रिय सण आहे. हा सण भारतात धुमधड्याकात साजरा केला जातो. आज आपण ह्याविषयी एक मराठी निबंध पाहणार आहोत. तसेच हा निबंध तुम्ही तुमच्या उपयोगासाठी नक्की वापरू शकता.

Diwali essay in marathi :- दिवाळी , सर्व सणांची राणी, हा एक उत्सव आहे जो सर्वोच्च राज्य करतो. सहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर, या भव्य सोहळ्याचे आगमन मोठ्या अपेक्षेने केले जाते. दिवाळीच्या पंधरा ते वीस दिवस अगोदर “आली दिवाळी, आली दिवाळी” च्या गजराने सगळीकडे जल्लोष निर्माण होतो.

हा आनंदाचा, एकत्रपणाचा आणि समृद्धीचा काळ आहे आणि सणांमध्ये सामील होण्यापेक्षा त्याचा अनुभव घेण्याचा दुसरा चांगला मार्ग नाही. चला तर मग, दिवाळीचे चैतन्य स्वीकारून त्याच्या वैभवाचा आनंद घेऊ या!

  • संपूर्ण मराठी आरती संग्रह | Aarti Sangrah in Marathi

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाला येणार्‍या दसऱ्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आमच्यात सामील व्हा. आगामी दिवाळी सणांच्या तयारीसाठी ही योग्य वेळ आहे आणि प्रत्येक घरामध्ये उत्साह संचारला आहे. आमची मुले विशेषतः रोमांचित आहेत आणि त्यांच्या आनंदाला सीमा नाही.

अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला, माता त्यांच्या पुढच्या अंगणांना उत्साही गेरूने सजवतात आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आकर्षक रांगोळ्या काढतात. आणि पाहुण्यांबद्दल बोलतांना, आम्ही तुम्हाला हा शुभ सोहळा साजरा करण्यासाठी आमच्यात सामील होण्यासाठी हार्दिक आमंत्रण देतो.

आपण एकत्र या आणि दसऱ्याच्या आनंदात आणि आशीर्वादाचा आनंद घेऊ या. आम्ही तुम्हाला प्रेम, हशा आणि आनंदाने भरलेला अविस्मरणीय अनुभव देतो. त्यामुळे तुमची कॅलेंडर चिन्हांकित करा आणि आमच्यासोबत साजरी करण्यासाठी सज्ज व्हा!

वसुबारसची पवित्र परंपरा साजरी करण्यात आम्हाला सामील व्हा, जिथे आम्ही द्वादशीला गाय आणि वासराची पूजा करतो. आणि दिवाळीच्या मुख्य दिवशी, नरकचतुर्दशी, आपण भगवान कृष्णाच्या वीर कृत्याचे स्मरण करतो कारण त्याने नरकासुराचा पराभव केला.

  • 50+ Save Water Slogans in Marathi“पाणी वाचवा घोषवाक्ये”

आणि असंख्य स्त्री-पुरुषांना कैदेतून मुक्त केले. महान सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या या महत्त्वपूर्ण घटनांना आपण एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पण करू या.

लक्ष्मी पूजनाचे महत्त्व विशेषत: व्यापाऱ्यांसाठी जास्त सांगता येणार नाही. बलिप्रतिपदा हा दान आणि त्यागाच्या भावनेचे स्मरण करणारा दिवस आहे. आणि भाऊबीज, बंधुप्रेमाचे बंधन साजरे करणारा दिवस विसरू नका.

या दिवाळीत , आपल्यातील मतभेदांची पर्वा न करता सर्वांवर प्रेम करण्याच्या महत्त्वाची आठवण करून दिली जाते. प्रत्येकजण लाडू, करंज्या आणि चकल्या यांसारख्या स्वादिष्ट मिठाईत. तसेच रात्रीचे आकाश रंगीबेरंगी फटाक्यांनी उजळून टाकत या सणाचा आनंद लुटता येतो.

  • दिवाळी सणाची माहिती, तथ्य, महत्व!

आणि नवीन कपडे घालणे आणि प्रियजनांसोबत मनापासून शुभेच्छांची देवाणघेवाण करणे कोणाला आवडत नाही? शाळांनाही सुट्ट्या असतात, त्यामुळे या सणासुदीच्या आनंदात भर पडते. या आनंदी दिवाळीची आपण जपणूक करूया आणि ती चिरकाल टिकू दे.

आजच्या लेखामध्ये आपण भारतीय सण दिवाळी बद्दल मराठी निबंध (Diwali essay in marathi) आपल्या मराठी भाषेत जाणून घेतला आहे. तुम्हाला ह्या माहितीचा उपयोग होईल, अशी मी आशा करतो. तसेच हा दिवाळी मराठी निबंध तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

  • तंत्रज्ञान: शाप की वरदान? | Marathi Essay
  • १० गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या जीवनात पाळल्या पाहिजेत

Related Posts

short essay on diwali in marathi

Marathi Suvichar | 500+ मराठी सुविचार – marathi suvichar images

short essay on diwali in marathi

Marathi Ukhane For Bride | 100+ नवरीसाठी मराठी उखाणे | Marathi Bride Ukhane

Leave a reply cancel reply.

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

short essay on diwali in marathi

  • Whats Cooking
  • Relationships
  • Art and Culture
  • Beauty and Care
  • Healthy Living
  • Tips & Tricks
  • Beauty & Care
  • Celebrity Fashion
  • Mutual Funds
  • Science And Future
  • Create on India
  • Ayodhya Ram Mandir
  • Oscars 2024
  • Indiatimes Frontlines
  • India On Plate
  • Sustainability
  • Give Up Plastic
  • The Great Indian Brain Drain
  • #DubaiLikeALocal

Diwali 2024 essay: Best short, long and easy essay on Diwali in English for kids and students

Diwali 2024, also known as the festival of lights, is a five-day celebration symbolising the victory of good over evil. this essay on diwali provides a detailed overview of the festival’s traditions, history, and significance..

Diwali 2024

Diwali 2024 essay ideas: Diwali, also called Deepavali, is one of the most significant and widely celebrated Hindu festivals. Falling on Friday, November 1, 2024, this five-day festival signifies the triumph of light over darkness, good over evil, and knowledge over ignorance. Diwali is celebrated with great enthusiasm across India and other parts of the world. The word "Diwali" comes from the Sanskrit words "dīpa" (light) and "āvali" (row), symbolizing rows of lamps .

Though Diwali has religious connections to Lord Rama’s return to Ayodhya after defeating Ravana, it is also a time to worship Goddess Lakshmi, the goddess of wealth, and Lord Ganesha, the god of wisdom.

With Diwali 2024 coming up soon, schools and colleges are organizing Diwali speech and essay competitions to help students improve their knowledge and build confidence in expressing themselves. If you're searching for ideas for both long and short Diwali essays in English, you're in the right place. We have listed some sample Diwali essays below that you can use for your school project. Take a look:

How to Start a Diwali Essay?

When writing an essay on Diwali, begin with a warm Diwali wish to engage the reader. Introduce the festival’s cultural significance and how it is celebrated across India. Explain the history and importance of Diwali, and conclude with a wish for a safe and joyful celebration.

Essay on Diwali 2024

Diwali 2024

This essay on Diwali is perfect for school students of all ages, from grades 5th to 10th and beyond. Whether you are looking for a short essay or a long essay on Diwali, this comprehensive guide covers it all. You can also download Diwali essays in PDF format for free to help with your studies.

Short Essay on Diwali

Diwali, also known as Deepavali, is the Festival of Lights celebrated with immense joy and enthusiasm across India. It marks the return of Lord Rama to Ayodhya after his victory over the demon king, Ravana, symbolizing the triumph of good over evil. On this day, people light earthen oil lamps, decorate their homes with rangolis, and burst firecrackers.

Families exchange gifts, and sweets, and wear new clothes. Goddess Lakshmi is worshipped to seek blessings for prosperity. Diwali 2024 will be a beautiful time to come together with loved ones and celebrate with happiness and unity.

How Diwali is Celebrated

Diwali celebrations vary, but the festival generally involves:

- Lighting Diyas: Small clay lamps filled with oil are lit to chase away darkness and evil.

- Decorating with Rangolis: Colorful rangoli designs made from coloured powders brighten homes.

- Bursting Firecrackers: Fireworks light up the sky, though people are moving toward eco-friendly options due to pollution concerns.

- Exchanging Gifts and Sweets: Neighbors, friends, and families share sweets and gifts as a token of love and goodwill.

The Significance of Diwali

The festival has deep spiritual meaning. It is a reminder of the victory of light over darkness and good over evil. The lighting of diyas symbolises hope, knowledge, and positivity, while firecrackers drive away negative energy. For many, Diwali also marks the beginning of a new year.

Long Essay on Diwali Celebration

Diwali is one of the most important and widely celebrated festivals in India. It has deep cultural, religious, and social meaning, bringing people together in a spirit of happiness and unity. The festival represents the victory of light over darkness, good over evil, and knowledge over ignorance.

Diwali usually falls in October or November. Preparations start weeks before, as families eagerly look forward to this big festival. Homes are thoroughly cleaned and decorated, and new clothes and utensils are bought. This not only prepares the home but also symbolises the inner cleansing of individuals and their surroundings.

The five-day celebration begins with Dhanteras , the first day. On this day, people worship Lord Dhanvantari, the Hindu god of medicine. It is also a tradition to buy gold and silver, as it is believed to bring good luck and wealth.

The second day, Naraka Chaturdashi, marks the victory of Lord Krishna over the demon Narakasura. People wake up early, take an oil bath for purification, and light oil lamps and candles in their homes and offices.

The third day is the main Diwali day, also called Lakshmi Puja. On this day, people worship Goddess Lakshmi, the goddess of wealth. Families gather to perform prayers and rituals to seek blessings for a prosperous year. Homes are decorated with oil lamps, colourful rangoli designs, and flowers. In the evening, fireworks are set off to celebrate the triumph of good over evil.

The fourth day is known as Govardhan Puja or Padwa. On this day, people honour Lord Krishna for lifting the Govardhan Hill to protect villagers from Lord Indra’s anger. People also visit relatives and friends, exchanging gifts and sweets.

The fifth and final day of Diwali is Bhai Dooj , also called Yama Dwitiya. This day celebrates the bond between brothers and sisters. Sisters prepare special meals for their brothers and apply a tilak (a red mark) on their foreheads, and in return, brothers give gifts to their sisters.

Diwali is a time of happiness, but it's important to celebrate safely. It’s a time for families and friends to come together, forgive past mistakes, and start fresh. It’s also a moment to be thankful for our blessings and share them with others.

10-Line Essay on Diwali

  • Diwali, also known as Deepavali, is the Festival of Lights.
  • It symbolises the victory of good over evil and light over darkness.
  • Diwali marks the return of Lord Rama to Ayodhya after defeating Ravana.
  • People celebrate by lighting diyas and decorating homes with rangolis.
  • Firecrackers are burst to signify the triumph of light.
  • Families exchange gifts and sweets to express love and goodwill.
  • Goddess Lakshmi and Lord Ganesha are worshipped for prosperity and wisdom.
  • Diwali lasts for five days, each with its own traditions.
  • On Choti Diwali, houses are illuminated with lamps.
  • Diwali promotes unity, happiness, and a spirit of togetherness.

Bhupinder Singh

Bhupinder Singh serves as a Principal Executive in Content Management, specializing in SEO content related to trending financial news, net worth of celebrities, historic events, and art and culture. His passion for cricket shines through in his work and personal interests. In his free time, Bhupinder enjoys discussing cricket legends like MS Dhoni and Sachin Tendulkar, as well as following the IPL.

Coffee health benefits: From healthy heart to antioxidants

Accept the updated Privacy & Cookie Policy

दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi

Essay On Diwali in Marathi: प्राचीन काळापासून सणांची भव्य परंपरा भारतात चालत येत आहे. घराचा दिवा पेटविणारी दीपावली किंवा दिवाळी खरोखरच भारतीय उत्सवांची राणी आहे. लोक वर्षभर तिची प्रतीक्षा करत असतात.

दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali in Marathi

संबंधित पौराणिक कथा.

काही लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा श्री रामचंद्रजी लंका आणि विजयानंतर अयोध्येत परत आले, तेव्हा अयोध्यातील रहिवाशांनी हा उत्सव दिवे प्रज्वलित करुन साजरा केला. तेव्हापासून हा सण लोकप्रिय झाला आहे. असे मानले जाते की महाराज युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाची समाप्ती या दिवशी झाली, तेव्हापासून हा उत्सव साजरा केला जातो. काही लोक दीपावलीला भगवान महावीरांचा निर्वाण दिवस मानतात. अशाप्रकारे, प्रत्येक भारतीय दीपावलीच्या उत्सवात जवळीक पाहतो.

दीपावली स्वच्छता व सजावटीचा सुवर्ण संदेश आपलया घरी घेऊन येते. तिच्या आगमनाच्या काही दिवस अगोदर, लोक आपली घरे स्वच्छ करण्यास प्रारंभ करतात. ते त्यांच्या घरातून वर्षभरातली घाण काढतात. ते नवीन कपडे शिवतात आणि दागदागिने खरेदी करतात. मिठाई आणि चविष्ट जेवण घरोघरी बनवले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे फटाके मुलांना आकर्षित करतात. खरं म्हणजे दिवाळी येण्यापूर्वी सर्वत्र आनंदाची लाट उसळते.

दीपावलीचे वर्णन

अश्विन महिन्याच्या कृष्णपक्षातील त्रयोदशी (धनतेरस) पासून कार्तिक महिन्याच्या शुक्लपक्षातील द्वितीया (भैयदुज) पर्यंत दीपावली धूमधामपणे साजरी करतात. घरोघरी असंख्य दिवे, मेणबत्त्या आणि इलेक्ट्रिक बल्ब पेटवले जातात. फटाके आणि अतिशबाजीने वातावरण दरवळून जाते. धनतेरसच्या दिवशी लोक संपत्तीची पूजा करतात. त्यानंतर छोटी दीपावली येते, ज्याला नरक चतुर्दशी देखील म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूने नरकासुराचा वध केला. दिवाळी म्हणजे अमावसचा दिवस व्यवसायातील लोक लेखाच्या नवीन पुस्तकांची पूजा करतात. दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी नवीन वर्ष सुरू होते. या दिवशी, लोक आनंदाने आपल्या प्रियजनांमध्ये मिसळतात आणि नवीन वर्षासाठी एकमेकांच्या शुभेच्छा व्यक्त करतात. मग, भाउबीजीच्या दिवशी बहीण भवाची आरती ओवाळून त्याला प्रेमाचा टिळा लावते आणि भाऊ मग बहिणीला ‘ओवाळणी’ देऊन तिचा सत्कार करतो.

दोष दूर करणे

दीपावली दरम्यान काही लोक जुगार खेळत दारू पितात, याद्वारे बऱ्याच लोकांचा नाश होतो. दीपावलीत फटाके खूप असल्यामुळे वायू प्रदूषण होते, बरेच लोक जळतात आणि कधीकधी भयानक जाळपोळ होते. या वाईट गोष्टी टाळल्या पाहिजेत.

आमचे अंगण आणि हृदय दोघेही दीपावलीच्या प्रकाशात उजळतात. आमच्या मत्सर आणि वैरभावनेच्या भावना प्रेम, सदभावना आणि मैत्रीत बदलतात, सामाजिक जीवनास एक नवीन प्रकाश मिळतो आणि नवीन वर्ष त्याच्या कर्तव्याची पूर्तता करण्यासाठी सामर्थ्य प्राप्त करते. खरंच, दीपावलीचा प्रत्येक दिवा म्हणजे एखाद्या महान माणसाचा आत्मा.

आनंद आणि प्रकाशाची देवी, हे दीपमालके ! तुझं नेहमीच स्वागत आहे.

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध
  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी
  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…
  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

COMMENTS

  1. Diwali Essay in Marathi (10 lines / 200 शब्द / 500 शब्द) दिवाळी निबंध

    Short Essay On Diwali In Marathi - (200 शब्द ) दिवाळी निबंध मराठी. दिवाळी हा हिंदूंचा अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण आहे. दिवाळी हा आपल्या भारतात साजरा ...

  2. दिवाळी वर मराठी निबंध

    माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi (700+ शब्दात) Diwali marathi nibandh. भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे.

  3. दिवाळी वर मराठी निबंध, Essay on Diwali in Marathi

    दिवाळी वर मराठी निबंध, Essay on Diwali in Marathi. भारत हा सणांचा देश मानला जातो. या सर्व सणांमध्ये होली, दिवाळी, दसरा, नवरात्री हे प्रमुख सण आहेत.

  4. दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi

    दिवाळी वर १० ओळीत मराठी निबंध 10 Line On Diwali In Marathi. १) दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. २) दिवाळी हा भारतात साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव आहे. ३ ...

  5. दिवाळी निबंध मराठी 10 ओळी

    दिवाळी निबंध मराठी 10 ओळी, 10 Lines on Diwali in Marathi, दिवाळीचा अर्थ आहे - प्रकाशाचा सण. लोक दिवाळीच्या आधी आपल्या घराची साफ-सफाई करतात. हा प्रकाश आणि आनंदाचा काळ असतो.

  6. Essay On Diwali

    Essay On Diwali : A "festival of lights," Diwali (also known as Divali or Deepavali) honours the blessings of victory, freedom, enlightenment, and the triumph of light over darkness and good over evil. The word "row of lights" (Sanksrit Deepavali) is where the name originates.

  7. माझा आवडता सण दिवाळी निबंध Diwali Essay In Marathi

    तसेच आपण diwali nibandh in marathi या लेखाचा वापर diwali essay in marathi for class 5 6 8 असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

  8. दिवाळी निबंध 10 ओळी

    3 Diwali Essay in Marathi 10 Lines - संच ३ 4 माझा आवडता सण दिवाळी निबंध 10 ओळी - संच ४ दिवाळी निबंध 10 ओळी - संच १

  9. दिवाळी निबंध मराठी मध्ये Best Essay on Diwali in Marathi

    जर तुम्ही दिवाळी निबंध मराठीमध्ये । Diwali Essay in Marathi । Essay on Diwali in Marathi शोधत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये आपण दिवाळी निबंध ...

  10. दिवाळी निबंध मराठी

    दिवाळी निबंध मराठी दिवाळी, ज्याला दीपावली असेही म्हटले जाते, हा भारतातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंददायी सण आहे Diwali Nibandh Marathi

  11. (Top 5) दिवाळी निबंध मराठी

    आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत 4 उत्तम Diwali Essay in Marathi - दिवाळी निबंध मराठी शेअर करीत आहोत.या लेखात देण्यात आलेले दिवाळी चे निबंध 100

  12. दिवाळी निबंध मराठी

    Diwali Essay in Marathi, दिवाळी निबंध मराठी, सर्व प्रथम, हे समजून घ्या की भारत हा सणांची भूमी आहे. तथापि, कोणताही सण दिवाळीच्या जवळ येत नाही. ... Short Essay On ...

  13. दिवाळी सणावरती 10 ओळी मराठी निबंध

    हा व्हिडिओ दिवाळी या सणावर ती सुंदर 10 ओळी मराठी निबंध प्रस्तुत करतो. हा ...

  14. दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi

    दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi प्रस्तावना (Introduction) दिवाळी हा हिंदूंच्या सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे जो मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला ...

  15. diwali essay in marathi 10 lines!! दिवाळी निबंधात या साध्या सोप्या ओळी!!

    शाळेतील मुलांसाठी 10 ओळी निबंध (diwali essay in marathi 10 lines) !माझ्या तर्फे दिवाळीच्या सर्वांना भरभरून हार्दिक शुभेच्छा! दिवाळी 2022हा एक दिव्यांचा सण ...

  16. माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध

    तर मित्रांनो हा होता माझ्या आवडता सण दिवाळी मराठी निबंध , Maza Avadta San Essay In Marathi एक छोटासा मराठी निबंध, तो तुम्हाला नक्की आवडला असेल अशी अशा ...

  17. दिवाळी वर मराठी निबंध

    दिवाळी मराठी निबंध. Diwali Nibandh Marathi: दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा ...

  18. दिवाळी

    दिवाळी या सणाला दीपावली असे देखील म्हणले जाते. दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृत मधील दोन शब्दांच्या उच्चाराने झाली. "दीप ...

  19. दिवाळी निबंध मराठी

    दिवाळी माहिती मराठी - दिवाळी 2022 वर निबंध मराठी - Diwali Marathi Nibandh - Essay on Diwali Festival in Marathi - Nibandh Lekhan on Diwali in Marathi - Marathi Essay on Diwali - Short Essay on Diwali in Marathi - Nibandh on Diwali in Marathi - Diwali Festival in Marathi ...

  20. दिवाळी 10 ओळी मराठी निबंध/10 lines Essay on Diwali in Marathi/दिपावली

    Hello friendswelcome to my channelSnehankur DeshingIn this video we will learn & writeदिवाळी 10 ओळी मराठी निबंध/10 lines Essay on Diwali in Marathi ...

  21. दिवाळी निबंध

    दिवाळी निबंध | 10 Lines on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi | Short Essay on Diwali in Marathi | maza avadta san diwali nibandh | About this Vi...

  22. दिवाळी मराठी निबंध

    Diwali essay in marathi:- आजच्या लेखामध्ये आपण भारतीय सण दिवाळी बद्दल मराठी निबंध (Diwali essay in marathi) पाहणार आहोत. दिवाळी हा भारतातील एक अत्यंत लोकप्रिय सण आहे.

  23. Essay on Diwali for Kids and Students

    Diwali 2024 essay: Best short, long and easy essay on Diwali in English for kids and students Diwali 2024, also known as the Festival of Lights, is a five-day celebration symbolising the victory of good over evil. This essay on Diwali provides a detailed overview of the festival's traditions, history, and significance.

  24. दिवाळी वर मराठी निबंध Essay On Diwali In Marathi

    Essay On Diwali in Marathi: प्राचीन काळापासून सणांची भव्य परंपरा भारतात चालत येत आहे. घराचा दिवा पेटविणारी दीपावली किंवा दिवाळी खरोखरच भारतीय उत्सवांची राणी आहे.